म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
अखंड ज्ञानोपासना, विद्वत्ता, वाचन, मनन, चिंतन, निर्भिडता, धारदार अग्रलेख, रोखठोक लिखाण, सर्वोत्तमाचा ध्यास, ध्येयनिष्ठता, तर्कनिष्ठता, वाचस्पती, चुकीच्या गोष्टींवर कठोर प्रहार, तळागाळातील घटकांविषयी आत्मियता...अशी वैविध्यपूर्ण, अष्टपैलू वैशिष्ट्ये असलेले गोविंदराव तळवलकर यांच्या नानाविध आठवणींचा कोलाज आदरांजलीच्या रूपाने पुन्हा एकदा वाचकांसमोर एखाद्या पटासारखा मांडण्यात आला. माटुंगा येथील रुईया कॉलेजच्या सभागृहात माजी संपादक गोविंदराव तळवलकर यांना ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी अनेक मान्यवरांनी तळवलकर यांच्या आठवणी जागवल्या.
गोविंदराव तळवलकर यांच्या आदरांजली कार्यक्रमास मोठ्या संख्येने वाचक उपस्थित राहिले. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी संपादक कुमार केतकर, भारतकुमार राउत, तळवलकरांचे स्नेही ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी तळवलकरांच्या आठवणी मांडल्या. सभेच्या प्रारंभी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक अशोक पानवलकर यांनी प्रास्ताविक केले. ‘आज मटा जे काही आहे, ती त्यांची पुण्याई आहे. ते सर तळवलकर होते. त्यांच्या जाण्याने पोरके झाल्यासारखे वाटते’, असे ते म्हणाले. अभिनेते व कवी किशोर कदम यांनी तळवलकरांच्या निवडक अग्रलेखांचे वाचन केले. या सभेचे सूत्रसंचालन वरिष्ठ सहसंपादक सारंग दर्शने यांनी केले.
अखंड ज्ञानोपासना, विद्वत्ता, वाचन, मनन, चिंतन, निर्भिडता, धारदार अग्रलेख, रोखठोक लिखाण, सर्वोत्तमाचा ध्यास, ध्येयनिष्ठता, तर्कनिष्ठता, वाचस्पती, चुकीच्या गोष्टींवर कठोर प्रहार, तळागाळातील घटकांविषयी आत्मियता...अशी वैविध्यपूर्ण, अष्टपैलू वैशिष्ट्ये असलेले गोविंदराव तळवलकर यांच्या नानाविध आठवणींचा कोलाज आदरांजलीच्या रूपाने पुन्हा एकदा वाचकांसमोर एखाद्या पटासारखा मांडण्यात आला. माटुंगा येथील रुईया कॉलेजच्या सभागृहात माजी संपादक गोविंदराव तळवलकर यांना ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी अनेक मान्यवरांनी तळवलकर यांच्या आठवणी जागवल्या.
गोविंदराव तळवलकर यांच्या आदरांजली कार्यक्रमास मोठ्या संख्येने वाचक उपस्थित राहिले. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी संपादक कुमार केतकर, भारतकुमार राउत, तळवलकरांचे स्नेही ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी तळवलकरांच्या आठवणी मांडल्या. सभेच्या प्रारंभी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक अशोक पानवलकर यांनी प्रास्ताविक केले. ‘आज मटा जे काही आहे, ती त्यांची पुण्याई आहे. ते सर तळवलकर होते. त्यांच्या जाण्याने पोरके झाल्यासारखे वाटते’, असे ते म्हणाले. अभिनेते व कवी किशोर कदम यांनी तळवलकरांच्या निवडक अग्रलेखांचे वाचन केले. या सभेचे सूत्रसंचालन वरिष्ठ सहसंपादक सारंग दर्शने यांनी केले.