अ‍ॅपशहर

hasan mushrif: करोनाने मृत्यू पावलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना ५० लाख देणार: हसन मुश्रीफ

राज्यात करोनाचा विळखा अधिक घट्ट बसत असताना प्रशासकिय अधिकाऱ्यांनाही करोनाचा संसर्ग होत आहे. परभणी जिल्ह्यातील सुपा या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रामदास आम्ले हे ग्रामस्थांना करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कर्तव्य बजावत असताना

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2020, 4:20 pm
मुंबईः राज्यात करोनाचा विळखा अधिक घट्ट बसत असताना प्रशासकिय अधिकाऱ्यांनाही करोनाचा संसर्ग होत आहे. परभणी जिल्ह्यातील सुपा या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रामदास आम्ले हे ग्रामस्थांना करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कर्तव्य बजावत असताना त्यांना करोनाचा संसर्ग झाला. ३ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसास ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे., अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hasan mushrif


वाचाः करोना बाधितांची रुग्णालयांकडून होतेय लूट; 'हा' घ्या पुरावा!

कर्तव्य बजावताना करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास विमा कवच रक्कम मिळण्याबाबत परभणी जिल्हा परिषदेने राज्य शासनास १२ ऑगस्ट रोजी प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावास तातडीने एका दिवसात मंजुरी देऊन मृत ग्रामविकास अधिकारी यांच्या वारसास ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे, मुश्रीफ यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेकडून प्राप्त प्रस्तावानुसार मृत ग्रामविकास अधिकारी यांचे वारस, त्यांची पत्नी श्रीमती रंजना आम्ले यांना विमा कवच रक्कम तातडीने म्हणजे उद्या स्वातंत्र्यदिनी परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

वाचाः 'ही' लढाई आपण नक्की जिंकू; अजित पवारांचं महत्त्वाचं विधान

करोना संकटकाळात ग्रामीण भागातील कर्मचारी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. ग्रामीण भागातही करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. हा प्रसार रोखण्यासाठी गावपातळीवरील कर्मचारी करोना योद्धा बनून काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर गावपातळीवर काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, संगणक परिचालक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी, कामगार यांना ३० सप्टेंबर २०२० पर्यंत ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज