सर्जिकल हल्ल्याचे संरक्षणमंत्र्यांकडून समर्थन
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
सर्जिकल हल्ल्यानंतर पाककडून काहीतरी कुरबुरी सुरू होणार, हे अपेक्षितच होते; परंतु आम्ही आक्रमक होणार नसलो, तरी राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास नेभळटपणे सहनही करणार नाही, असा संदेश यामुळे पाकिस्तानला मिळाला आहे. पाककडून झालेले युद्धबंदी कराराचे उल्लंघन त्यांच्या अंतर्गत राजकीय व लष्करी कारणातून झाले आहे, हे त्यांची वेळ पाहूनच स्पष्ट होईल. तरीही सीमेवरचा तणाव आता निवळत आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयएनएस चेन्नईच्या कमिशनिंगप्रसंगी सांगितले.
सर्जिकल हल्ल्यानंतर पाककडून चकमकी वाढल्या आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना पर्रीकर बोलत होते. पाकिस्तान त्यांची आक्रमक आघाडी थांबवत नाही, तोपर्यंत सीमेवर शांतता कठीण आहे. पाकने युद्धबंदी कराराचे उल्लंघन थांबविले, तर तणाव आपोआप कमी होईल. पाकबरोबर संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरेच प्रयत्न केले, मात्र ही गोष्ट राष्ट्रीय सुरक्षेचा बळी देऊन होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
संरक्षण सामग्री संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) चांगली प्रगती केली आहे, मात्र त्यांची आणखी क्षमता आहे व ती त्यांनी पूर्णपणे वापरल्यास अनेक रेंगाळलेले प्रकल्प लवकर पूर्ण होतील, अशी अपेक्षा संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली. ५० हजार कोटींचा तेजस विमानांचा प्रकल्प आता रुळावर आला आहे.
भारतीय हवाई दल व लष्कर यांच्यासाठी ‘एचएएल’निर्मित लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर घेण्याचे निश्चित झाले आहे. याअंतर्गत सुरुवातीस १५ हेलिकॉप्टर घेण्यात येतील. नौदलासाठीची हेलिकॉप्टरखरेदी दोन वर्षांत मार्गी लागेल.
चव्हाण यांच्यासाठी प्रयत्न
पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यामुळे बेपत्ता असलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्याविषयी नेहमीच्या प्रमाणित पद्धतींनुसार प्रयत्न सुरू आहेत व भारताने लष्करी कारवाया महासंचालकांच्या पातळीवर (डीजीएमओ) त्याचा पाठपुरावा केला आहे. यापूर्वीही अशाप्रकारे जवानांना परत पाठविण्याची देवाणघेवाण झाली आहे. मात्र सध्या वातावरण तणावपूर्ण असल्याने ते शक्य झालेले नाही. चव्हाण यांच्या खुशालीविषयी आम्हाला आश्वस्त करण्यात आले आहे.
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
सर्जिकल हल्ल्यानंतर पाककडून काहीतरी कुरबुरी सुरू होणार, हे अपेक्षितच होते; परंतु आम्ही आक्रमक होणार नसलो, तरी राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास नेभळटपणे सहनही करणार नाही, असा संदेश यामुळे पाकिस्तानला मिळाला आहे. पाककडून झालेले युद्धबंदी कराराचे उल्लंघन त्यांच्या अंतर्गत राजकीय व लष्करी कारणातून झाले आहे, हे त्यांची वेळ पाहूनच स्पष्ट होईल. तरीही सीमेवरचा तणाव आता निवळत आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयएनएस चेन्नईच्या कमिशनिंगप्रसंगी सांगितले.
सर्जिकल हल्ल्यानंतर पाककडून चकमकी वाढल्या आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना पर्रीकर बोलत होते. पाकिस्तान त्यांची आक्रमक आघाडी थांबवत नाही, तोपर्यंत सीमेवर शांतता कठीण आहे. पाकने युद्धबंदी कराराचे उल्लंघन थांबविले, तर तणाव आपोआप कमी होईल. पाकबरोबर संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरेच प्रयत्न केले, मात्र ही गोष्ट राष्ट्रीय सुरक्षेचा बळी देऊन होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
संरक्षण सामग्री संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) चांगली प्रगती केली आहे, मात्र त्यांची आणखी क्षमता आहे व ती त्यांनी पूर्णपणे वापरल्यास अनेक रेंगाळलेले प्रकल्प लवकर पूर्ण होतील, अशी अपेक्षा संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली. ५० हजार कोटींचा तेजस विमानांचा प्रकल्प आता रुळावर आला आहे.
भारतीय हवाई दल व लष्कर यांच्यासाठी ‘एचएएल’निर्मित लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर घेण्याचे निश्चित झाले आहे. याअंतर्गत सुरुवातीस १५ हेलिकॉप्टर घेण्यात येतील. नौदलासाठीची हेलिकॉप्टरखरेदी दोन वर्षांत मार्गी लागेल.
चव्हाण यांच्यासाठी प्रयत्न
पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यामुळे बेपत्ता असलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्याविषयी नेहमीच्या प्रमाणित पद्धतींनुसार प्रयत्न सुरू आहेत व भारताने लष्करी कारवाया महासंचालकांच्या पातळीवर (डीजीएमओ) त्याचा पाठपुरावा केला आहे. यापूर्वीही अशाप्रकारे जवानांना परत पाठविण्याची देवाणघेवाण झाली आहे. मात्र सध्या वातावरण तणावपूर्ण असल्याने ते शक्य झालेले नाही. चव्हाण यांच्या खुशालीविषयी आम्हाला आश्वस्त करण्यात आले आहे.