मुंबई : राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जुलै ते डिसेंबरदरम्यान प्रस्तावित असलेल्या १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती राज्य सरकारमार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे नुकतीच करण्यात आली होती. त्यानुसार या निवडणुकांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने कळवले आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.
ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्यावयाच्या झाल्यास त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक यंत्रणेवर ताण, वोटिंग मशिनचा सामुदायिक वापर, प्रचारासाठी होणारी गर्दी, सभा, मेळावे, पदयात्रा या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी अनेक जण एकत्र येण्याची शक्यता आहे. राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव पाहता अशी गर्दी धोकादायक ठरू शकते. शिवाय, ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करणे, प्रभागाची रचना प्रस्तावित करणे, प्रभागनिहाय मतदारयादी तयार करणे आदी बाबींकरिता वेळ लागतो. या निवडणुकांमुळे वाढणारी तीव्र जोखीम लक्षात घेऊन त्या पुढे ढकलण्यात याव्यात व पुढील सहा महिने कोणत्याही निवडणुका न घेण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अशी विनंती आयोगास करण्यात आली होती.
ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्यावयाच्या झाल्यास त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक यंत्रणेवर ताण, वोटिंग मशिनचा सामुदायिक वापर, प्रचारासाठी होणारी गर्दी, सभा, मेळावे, पदयात्रा या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी अनेक जण एकत्र येण्याची शक्यता आहे. राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव पाहता अशी गर्दी धोकादायक ठरू शकते. शिवाय, ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करणे, प्रभागाची रचना प्रस्तावित करणे, प्रभागनिहाय मतदारयादी तयार करणे आदी बाबींकरिता वेळ लागतो. या निवडणुकांमुळे वाढणारी तीव्र जोखीम लक्षात घेऊन त्या पुढे ढकलण्यात याव्यात व पुढील सहा महिने कोणत्याही निवडणुका न घेण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अशी विनंती आयोगास करण्यात आली होती.