कामत गटाचे जिल्हाध्यक्ष बदलण्याचे निरुपम यांची मागणी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास अवघे पाच महिने उरलेले असताना मुंबईमध्ये जिल्हाध्यक्षांच्या नेमणुकीवरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांच्या गटांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. निरुपम यांनी, कामत गटाचे जिल्हाध्यक्ष बदलण्याची शिफारस काँग्रेस हायकमांडकडे केल्यारून या दोन गटात वाद रंगला आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना संजय निरुपम यांनी मुंबईतील सहा जिल्हाध्यक्ष बदलण्यात यावे, अशी मागणी हायकमांडकडे केली आहे. मुंबईतील सहापैकी चार जिल्हाध्यक्ष हे कामत गटाचे आहेत. परंतु त्यांना हटवून निरुपम यांना आपले स्थान मजबूत करायचे आहे. सहा लोकसभा मतदारसंघनिहाय सहा जिल्हाध्यक्ष आहे. या सहाही जिल्हाध्यक्षांना हटवून तेथे आपल्या समर्थकांची नावे निरुपम यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविली आहेत. त्यावरुन मुंबई काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.
प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदावरून मोहन प्रकाश यांना हटवून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, मल्लिकार्जून खरगे यांची नेमणूक केली आहे. खरगे यांनी अलीकडेच प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. निरुपम यांनी सहा जणांची नावे सहा जिल्हाध्यक्षपदासाठी पाठिवली आहे. परंतु निरुपम यांच्याविरोधात मुंबई काँग्रेसमधील गुरुदास कामत, कृपाशंकर सिंह, मिलिंद देवरा, प्रिया दत्ता या नेत्यांचे गट दिल्लीत जावून तक्रार करत आहेत. निरुपम यांनी पाठविलेल्या नावांबाबत या नेत्यांच्या समर्थकांचा आक्षेप आहे. त्यामुळे या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या तूर्तात करू नयेत. लोकसभेच्या निवडणुका पाच महिन्यांवर आल्या आहेत. जर नवे जिल्हाध्यक्ष आले तर त्यांना काम करता येणार नाही, तसेच निवडणुकीत गटबाजी होईल, असे मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी खरगे यांना सांगितले असल्याचे कळते.
मुंबईत केवळ पाच आमदार काँग्रेसचे आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका निरुपम यांच्या नेतृत्वाखाली लढवू नयेत. मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष बदलण्यात यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसमधील निरुपम यांच्याविरोधकांनी खरगे यांच्याकडे केली आहे.
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास अवघे पाच महिने उरलेले असताना मुंबईमध्ये जिल्हाध्यक्षांच्या नेमणुकीवरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांच्या गटांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. निरुपम यांनी, कामत गटाचे जिल्हाध्यक्ष बदलण्याची शिफारस काँग्रेस हायकमांडकडे केल्यारून या दोन गटात वाद रंगला आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना संजय निरुपम यांनी मुंबईतील सहा जिल्हाध्यक्ष बदलण्यात यावे, अशी मागणी हायकमांडकडे केली आहे. मुंबईतील सहापैकी चार जिल्हाध्यक्ष हे कामत गटाचे आहेत. परंतु त्यांना हटवून निरुपम यांना आपले स्थान मजबूत करायचे आहे. सहा लोकसभा मतदारसंघनिहाय सहा जिल्हाध्यक्ष आहे. या सहाही जिल्हाध्यक्षांना हटवून तेथे आपल्या समर्थकांची नावे निरुपम यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविली आहेत. त्यावरुन मुंबई काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.
प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदावरून मोहन प्रकाश यांना हटवून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, मल्लिकार्जून खरगे यांची नेमणूक केली आहे. खरगे यांनी अलीकडेच प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. निरुपम यांनी सहा जणांची नावे सहा जिल्हाध्यक्षपदासाठी पाठिवली आहे. परंतु निरुपम यांच्याविरोधात मुंबई काँग्रेसमधील गुरुदास कामत, कृपाशंकर सिंह, मिलिंद देवरा, प्रिया दत्ता या नेत्यांचे गट दिल्लीत जावून तक्रार करत आहेत. निरुपम यांनी पाठविलेल्या नावांबाबत या नेत्यांच्या समर्थकांचा आक्षेप आहे. त्यामुळे या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या तूर्तात करू नयेत. लोकसभेच्या निवडणुका पाच महिन्यांवर आल्या आहेत. जर नवे जिल्हाध्यक्ष आले तर त्यांना काम करता येणार नाही, तसेच निवडणुकीत गटबाजी होईल, असे मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी खरगे यांना सांगितले असल्याचे कळते.
मुंबईत केवळ पाच आमदार काँग्रेसचे आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका निरुपम यांच्या नेतृत्वाखाली लढवू नयेत. मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष बदलण्यात यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसमधील निरुपम यांच्याविरोधकांनी खरगे यांच्याकडे केली आहे.