अ‍ॅपशहर

राज्यात उष्णतेची लाट कायम

मुंबई : राज्यात नाशिक, सातारा, जळगाव आदी भागांत उष्णतेची लाट कायम असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील २४ तासांत तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीस अंश सेल्सिअसने अधिक असेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई बुधवारीही तापलेली राहील, असा अंदाज आहे.

Maharashtra Times 19 Apr 2017, 12:53 am
मुंबई : राज्यात नाशिक, सातारा, जळगाव आदी भागांत उष्णतेची लाट कायम असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील २४ तासांत तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीस अंश सेल्सिअसने अधिक असेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई बुधवारीही तापलेली राहील, असा अंदाज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम heat wave continues in maharashtra
राज्यात उष्णतेची लाट कायम


मुंबईत मंगळवारी सकाळी कुलाबा येथे ३४.१ अंश से., तर सांताक्रुझमध्ये ३३.१ अश से. तापमान नोंदवण्यात आले. बुधवारी मुंबई तापमान व आर्द्रता वाढलेली असेल असा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना घामाघूम व्हावे लागणार अशी चिन्हे आहेत.

राज्यात विदर्भातही उष्णतेची लाट कायम राहाणार आहे. अकोला ४५, अमरावती ४४, ब्रह्मपुरी ४६, बुलडाणा ४१, चंद्रपूर ४६, नागपूर व वर्धा ४५ व यवतमाळमध्ये ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. नाशिक, जळगाव, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड व नांदेडमध्ये उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण व गोव्यात गेलेल्या पर्यटकांनाही तापलेल्या उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज