मुंबई
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकडे पाठ फिरवलेल्या पावसाने आज मुंबई, उपनगरे आणि ठाणे परिसरात हजेरी लावली असून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असून आज दिवसभर जोरदार पावसाचा अंदाज स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेने व्यक्त केला आहे.
आज सकाळपासून दक्षिण मुंबई, तसेच उपनगरांतील घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड, अंधेरी, जोगेश्वरी बोरिवली परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्याच बरोबर ठाणे, भिवंडी, कल्याण तसेच वसई, विरार परिसरातही पाऊस सुरू झाला. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचायला सुरूवात झाली आहे. या बरोबरच नवी मुंबईत वाशी, बेलापूर आणि पनवेलमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मुंबईतील सखल भागात पाणी साचणे सुरू
मुंबईतही जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच मुंबईतील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कल्याणमधील चिखलघर परिसरातही पाणी साचल्याचे वृत्त आहे.
मुंबईतील सखल समजल्या जाणाऱ्या किंग्ज सर्कल परिसरातही पाणी साचले.
पालघर जिल्ह्यातही मुसळधार
पालघर जिल्ह्यात पश्चिम पट्ट्यात शुक्रवारी पहाटे पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून पूर्व पट्ट्यात गुरुवारी रात्री आठ वाजल्या पासून संततधार सुरू आहे,
जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, तलासरी या तालुक्यात गुरुवारी रात्री आठ नंतर पावसाला सुरुवात झाली आहे, शुक्रवारी देखील पाऊस पडत असून उकाड्याने हैराण झालेल्या शेतकरी व नागरिक रात्री पासून बऱ्यापैकी गारवा जाणवू लागला आहे. शेतकऱ्यांना बी पेरणी करायची आहे मात्र पाऊस असल्याने जमिनीला वापसा नसल्याने जो पर्यंत पाऊस थांबत नाही तो पर्यंत बळीराजा बी पेरणी करणार नाही,
पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम
मुंबई आणि परिसरात सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम लोकल सेवेवरही झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे.
मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम दृतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.
या ठिकाणांवर साचले पाणी
सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सायनमधील गांधी मार्केट परिसर आणि हिंदमाता सिमेमाजवळ पाणी साचले. त्याच प्रमाणे ठाण्यातील मखमली तलाव परिसरात पाणी साचले.
बसमार्गांत बदल
मुंबई आणि ठाण्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे बसमार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ठाण्यातील मखमली तलावाजवळून जाणारे ४९४ आणि ४९९ या मार्गामध्ये बदल करून हे मार्ग वंदना टॉकिज फ्लायओव्हरवरून वळवले आहेत.
सायन परिसरात पाणी साचल्यामुळे बसमार्ग २४, २५, २२, ३०२, ३०५ आणि २१३ हे मार्ग मेन रोडवरून वळवण्यात आले आहे.
तसेच, हिंदमाता परिसरात पाणी साचल्यामुळे बसमार्ग १, ४, ५, ६, ७, ८, ११, २१ या शिवडीला जाणाऱ्या बसगाड्या शारदा टॉकिज मार्गे वळवल्या आहेत.
नवी मुंबईतही साचले पाणी
नवी मुंबईत अनेत ठिकाणी मुसळधार पावसानंतर पाणी साचले आहे. नाल्यांमधील गाळ न काढल्यामुळे रस्त्यांवर दोन-दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. या मुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकडे पाठ फिरवलेल्या पावसाने आज मुंबई, उपनगरे आणि ठाणे परिसरात हजेरी लावली असून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असून आज दिवसभर जोरदार पावसाचा अंदाज स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेने व्यक्त केला आहे.
आज सकाळपासून दक्षिण मुंबई, तसेच उपनगरांतील घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड, अंधेरी, जोगेश्वरी बोरिवली परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्याच बरोबर ठाणे, भिवंडी, कल्याण तसेच वसई, विरार परिसरातही पाऊस सुरू झाला. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचायला सुरूवात झाली आहे. या बरोबरच नवी मुंबईत वाशी, बेलापूर आणि पनवेलमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मुंबईतील सखल भागात पाणी साचणे सुरू
मुंबईतही जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच मुंबईतील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कल्याणमधील चिखलघर परिसरातही पाणी साचल्याचे वृत्त आहे.
मुंबईतील सखल समजल्या जाणाऱ्या किंग्ज सर्कल परिसरातही पाणी साचले.
पालघर जिल्ह्यातही मुसळधार
पालघर जिल्ह्यात पश्चिम पट्ट्यात शुक्रवारी पहाटे पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून पूर्व पट्ट्यात गुरुवारी रात्री आठ वाजल्या पासून संततधार सुरू आहे,
जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, तलासरी या तालुक्यात गुरुवारी रात्री आठ नंतर पावसाला सुरुवात झाली आहे, शुक्रवारी देखील पाऊस पडत असून उकाड्याने हैराण झालेल्या शेतकरी व नागरिक रात्री पासून बऱ्यापैकी गारवा जाणवू लागला आहे. शेतकऱ्यांना बी पेरणी करायची आहे मात्र पाऊस असल्याने जमिनीला वापसा नसल्याने जो पर्यंत पाऊस थांबत नाही तो पर्यंत बळीराजा बी पेरणी करणार नाही,
पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम
मुंबई आणि परिसरात सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम लोकल सेवेवरही झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे.
मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम दृतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.
या ठिकाणांवर साचले पाणी
सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सायनमधील गांधी मार्केट परिसर आणि हिंदमाता सिमेमाजवळ पाणी साचले. त्याच प्रमाणे ठाण्यातील मखमली तलाव परिसरात पाणी साचले.
बसमार्गांत बदल
मुंबई आणि ठाण्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे बसमार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ठाण्यातील मखमली तलावाजवळून जाणारे ४९४ आणि ४९९ या मार्गामध्ये बदल करून हे मार्ग वंदना टॉकिज फ्लायओव्हरवरून वळवले आहेत.
सायन परिसरात पाणी साचल्यामुळे बसमार्ग २४, २५, २२, ३०२, ३०५ आणि २१३ हे मार्ग मेन रोडवरून वळवण्यात आले आहे.
तसेच, हिंदमाता परिसरात पाणी साचल्यामुळे बसमार्ग १, ४, ५, ६, ७, ८, ११, २१ या शिवडीला जाणाऱ्या बसगाड्या शारदा टॉकिज मार्गे वळवल्या आहेत.
नवी मुंबईतही साचले पाणी
नवी मुंबईत अनेत ठिकाणी मुसळधार पावसानंतर पाणी साचले आहे. नाल्यांमधील गाळ न काढल्यामुळे रस्त्यांवर दोन-दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. या मुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत.