अ‍ॅपशहर

मुंबईसह ठाण्यात पावसाची दाणादाण

मुंबईसह ठाण्यात गेल्या चार दिवसापांसून मुक्काम ठोकणाऱ्या पावसाने आजही जोरदार बॅटिंग केली. पहाटेपासूनच पावसाने जोर धरल्याने शहरांतील अनेक भागांत पाणी तुंबले. मात्र, शनिवार असल्यानं व अनेक कार्यालयांना सुट्टी असल्यामुळं रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी तितकीशी दिसली नाही. याउलट, वीकेण्डची संधी साधून अनेकांनी पावसाचा मनसोक्त आनंद लुटला.

Maharashtra Times 22 Jul 2017, 2:58 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम heavy rain floods commercial capital leads to traffic jam
मुंबईसह ठाण्यात पावसाची दाणादाण


मुंबईसह ठाण्यात गेल्या चार दिवसापांसून मुक्काम ठोकणाऱ्या पावसाने आजही जोरदार बॅटिंग केली. पहाटेपासूनच पावसाने जोर धरल्याने शहरांतील अनेक भागांत पाणी तुंबले. मात्र, शनिवार असल्यानं व अनेक कार्यालयांना सुट्टी असल्यामुळं रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी तितकीशी दिसली नाही. याउलट, वीकेण्डची संधी साधून अनेकांनी पावसाचा मनसोक्त आनंद लुटला.

गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह ठाण्याला पावसाने झोडपून काढले आहे. आजही संततधार सुरूच होती. या पावसाचा लोकल वाहतुकीला काही प्रमाणात फटका बसला. पावसामुळे मध्य आणि हर्बर मार्गावरील लोकल १० मिनिटे उशिरानं धावत होत्या. मुसळधार पावसामुळे गोरेगावच्या ओबेरॉय मॉल समोर प्रचंड पाणी तुंबले होते. गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने मॉल समोर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी तात्काळ पंप लावून पाण्याचा निचरा केला. अंधेरीच्या मिलन सब-वेसह दादरच्या अनेक भागातही पाणी साचले होते. त्यामुळं या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे.



पिकनिक स्पॉट फुलून गेले!

आज आणि उद्या दोन दिवस सुट्टीचे आल्याने आणि सोमवारी गटारी असल्याने या संधीचा फायदा घेत तरुणांनी शुक्रवारी संध्याकाळीच पिकनिक स्पॉट गाठले. त्यामुळं मुंबई-ठाणे-पुणे परिसरातील सर्व पिकनीक स्पॉट पर्यटकांनी गजबजून गेले होते. काही मुंबईकरांनी तर कुटुंबकबिल्यांसह मुंबईतील चौपाट्यावर कूच केली. त्यामुळं नरीमन पॉइंट, जुहू, मार्वेसह मुंबईतील सर्व चौपाट्यांवर तुफान गर्दी झाली होती. पावसानं या भटकंतीचा आनंद द्विगुणित केला.

पाणीबाणीचे नो टेन्शन

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार आणि मोडकसागर हे तलाव भरून वाहू लागले आहेत. धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तलावांमध्ये ११ लाख ७६ हजार ४७९ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला असून मुंबईकरांवरील पाणी संकट टळलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज