मुंबई/ रत्नागिरी/कोल्हापूर:
मुंबई, उपनगरांसह ठाणे जिल्हा, कोकण आणि पश्चिम-उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक महत्वाच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
LIVE UPDATES:
नागपूर: सतत मुसळधार पाऊसाने कळमना परिसरातील नेताजी नगर परिसरात पूरसदृश्य स्थिती
कल्याण: उल्हास नदीला पूर; कल्याण-मुरबाड रस्ता बंद
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची हजेरी
कल्याण, बदलापूरला पावसाने पुन्हा झोडपले, पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज
पुणे: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; भिडे पूल वाहतुकीसाठी बंद
पुणे: मुठा नदी भरून वाहू लागली...
नाशिक: गोदावरी नदीला पूर...काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
पुणे: मुसळधार पावसामुळे पानशेत परिसरातील ओढे, नाले दुथडी वाहत आहेत....
पुणे: रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने पौड फाटा, कर्वे रस्त्यावर वाहतूक कोंडी...सावरकर उड्डाणपुलावरही वाहनांच्या रांगा
पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
>> पुण्यात पावसाचा जोर, मुठा नदी दुथडी वाहू लागल्याने भिडे पूल पाण्याखाली
रत्नागिरीत पावसाची संततधार सुरूच आहे. चांदेराई बाजारपेठेत पावसाचे पाणी शिरले आहे. चांदेराई-लांजा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावर पाच फुटापर्यंत पाणी साचले आहे. संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत आहे. संगमेश्वरसह माखजनला पुराचा धोका निर्माण झाला आहे. चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. सखल भागांत पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. वशिष्ठी आणि शीव नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, पुराचा धोका आहे. जुना बाजार पूल आणि नाईक कंपनीसमोरील परिसर पाण्याखाली गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
कोकणात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
कोकणात संततधार सुरूच असून, नद्या दुथडी वाहत आहेत.
रत्नागिरीतील चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातही सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. गगनबावडा मार्गावर, तसेच मांडुकली गावाजवळ रस्त्यावर दीड फूट पाणी साचले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वैभववाडीकडून येणाऱ्या वाहन चालकांना गगनबावडा येथे थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार भोगाव व पोहाळे तर्फे बोरगाव या दरम्यान रस्त्यावर तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळं वाहतूक बंद आहे. शाहुवाडी तालुक्यात जोरदार पाऊस बरसत आहे. कडवी धरण शंभर टक्के भरले आहे. गोठे परखंदळे पुलावर तीन ते साडेतीन फूट पाणी साचले आहे. त्यामुळं वाहतूक बंद करण्यात आली आहे. हातकणंगलेमधील निलेवाडी-ऐतवडे खुर्द पुलावरून पाणी गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आली असून, परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूर शहराजवळील कलंबा तलाव ओसंडून वाहत आहे. जिल्ह्यातील ७८ धरणे ओसंडून वाहत असून, चांदोली धरण ८० टक्के भरले आहे.
कोल्हापूर शहराजवळील कलंबा तलाव ओसंडून वाहत आहे.
कोल्हापुरातील गगनबावडा रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळं वाहतूक बंद आहे.
गोठे परखंदळे पुलावर तीन ते साडेतीन फूट पाणी साचले आहे.
गडचिरोलीतही मुसळधार पाऊस कोसळत असून, पर्लाकोटा नदीला पूर आला आहे. आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. पेरमिलीजवळ पुलावरून पाणी गेल्याने पेरमिली-भामरागड मार्ग बंद आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरूच असल्यानं नाशिक जिल्ह्यातील धरणे ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबई, उपनगरांसह ठाणे जिल्हा, कोकण आणि पश्चिम-उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक महत्वाच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
LIVE UPDATES:
नागपूर: सतत मुसळधार पाऊसाने कळमना परिसरातील नेताजी नगर परिसरात पूरसदृश्य स्थिती
कल्याण: उल्हास नदीला पूर; कल्याण-मुरबाड रस्ता बंद
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची हजेरी
कल्याण, बदलापूरला पावसाने पुन्हा झोडपले, पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज
पुणे: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; भिडे पूल वाहतुकीसाठी बंद
नाशिक: गोदावरी नदीला पूर...काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
पुणे: मुसळधार पावसामुळे पानशेत परिसरातील ओढे, नाले दुथडी वाहत आहेत....
पुणे: रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने पौड फाटा, कर्वे रस्त्यावर वाहतूक कोंडी...सावरकर उड्डाणपुलावरही वाहनांच्या रांगा
>> पुण्यात पावसाचा जोर, मुठा नदी दुथडी वाहू लागल्याने भिडे पूल पाण्याखाली
रत्नागिरीत पावसाची संततधार सुरूच आहे. चांदेराई बाजारपेठेत पावसाचे पाणी शिरले आहे. चांदेराई-लांजा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावर पाच फुटापर्यंत पाणी साचले आहे. संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत आहे. संगमेश्वरसह माखजनला पुराचा धोका निर्माण झाला आहे. चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. सखल भागांत पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. वशिष्ठी आणि शीव नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, पुराचा धोका आहे. जुना बाजार पूल आणि नाईक कंपनीसमोरील परिसर पाण्याखाली गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातही सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. गगनबावडा मार्गावर, तसेच मांडुकली गावाजवळ रस्त्यावर दीड फूट पाणी साचले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वैभववाडीकडून येणाऱ्या वाहन चालकांना गगनबावडा येथे थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार भोगाव व पोहाळे तर्फे बोरगाव या दरम्यान रस्त्यावर तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळं वाहतूक बंद आहे. शाहुवाडी तालुक्यात जोरदार पाऊस बरसत आहे. कडवी धरण शंभर टक्के भरले आहे. गोठे परखंदळे पुलावर तीन ते साडेतीन फूट पाणी साचले आहे. त्यामुळं वाहतूक बंद करण्यात आली आहे. हातकणंगलेमधील निलेवाडी-ऐतवडे खुर्द पुलावरून पाणी गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आली असून, परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूर शहराजवळील कलंबा तलाव ओसंडून वाहत आहे. जिल्ह्यातील ७८ धरणे ओसंडून वाहत असून, चांदोली धरण ८० टक्के भरले आहे.
गडचिरोलीतही मुसळधार पाऊस कोसळत असून, पर्लाकोटा नदीला पूर आला आहे. आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. पेरमिलीजवळ पुलावरून पाणी गेल्याने पेरमिली-भामरागड मार्ग बंद आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरूच असल्यानं नाशिक जिल्ह्यातील धरणे ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे.