मुंबई:
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आजही मुंबई-ठाण्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. पावसाने सकाळपासून सुरू केलेल्या जोरदार माऱ्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास तर हार्बर लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. हिंदमाता, किंग्ज सर्कल, चेंबूर आणि सायन आदी सखल भागांत पाणी साचल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. तर घाटकोपर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल झुकल्याचं दिसून आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने घाटकोपरमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबई-ठाण्यात आज सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे मुंबई-ठाणेकरांना घरातून बाहेर पडणंही मुश्किल झालं आहे. मुसळधार पावसामुळे हिंदमाता, चेंबूर, दादर, किंग्ज सर्कल, सायन, कुर्ला, वडाळा, सिद्धार्थ नगर गोरेगाव आदी सखल भागत पाणी तुंबलं आहे. त्यामुळे या ठिकाणी काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मात्र आज सुट्टीचा दिवस आणि त्यात जोराचा पाऊस सुरू असल्याने मुंबईकरांनी घराबाहेर पडण्याचं टाळल्याने वाहतूक कोंडीचा फारसा परिणाम जाणवला नाही. या परिसरात पाणी साचल्याने बेस्ट बसचे मार्गही वळविण्यात आले आहेत.
मेगाब्लॉक रद्द
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेने भायखळा आणि विद्याविहार दरम्यानचा आजचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. पावसामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून हा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक कायम राहणार असल्याचं रेल्वेनं सांगितलं.
पूल झुकला?
घाटकोपर येथे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल झुकल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. अंधेरी- घाटकोपरला जोडणाऱ्या या पुलाची लवकरच डागडूजी करण्यात येणार आहे. तो पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद राहिल, असं सूत्रांनी सांगितलं.
मानखुर्दमध्ये महिलेचा मृत्यू
शनिवारी मानखुर्दच्या पीएमजी कॉलनतीली मोहिते पाटील नगर येथे शॉर्ट लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून एक लहान मुलगी जखमी झाली आहे. उषा सावंत असं या मृत महिलेचं नाव आहे. या महिलेला बाजूच्याच कोळेकर रुग्णालयात नेण्यात आले असता तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. तर या महिलेच्या ५ वर्षाच्या मुलीलाही शॉक लागल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत.
वसईतील पूलही बंद
वसईतील पूर्व-पश्चिमेला जोडणारा जुना अंबाडी पूलही दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. हा पूल अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पावसाचे अपडेट्स:
>> घाटकोपर येथील पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद, पुलाचा काही भाग झुकल्याचा अंदाज
>> मुंबईच्या असल्फा भागात पाणी साचलं
>> वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीचा वेग मंदावला
>> दादर, लालबाग, वरळी भागात जोरदार पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आजही मुंबई-ठाण्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. पावसाने सकाळपासून सुरू केलेल्या जोरदार माऱ्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास तर हार्बर लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. हिंदमाता, किंग्ज सर्कल, चेंबूर आणि सायन आदी सखल भागांत पाणी साचल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. तर घाटकोपर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल झुकल्याचं दिसून आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने घाटकोपरमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबई-ठाण्यात आज सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे मुंबई-ठाणेकरांना घरातून बाहेर पडणंही मुश्किल झालं आहे. मुसळधार पावसामुळे हिंदमाता, चेंबूर, दादर, किंग्ज सर्कल, सायन, कुर्ला, वडाळा, सिद्धार्थ नगर गोरेगाव आदी सखल भागत पाणी तुंबलं आहे. त्यामुळे या ठिकाणी काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मात्र आज सुट्टीचा दिवस आणि त्यात जोराचा पाऊस सुरू असल्याने मुंबईकरांनी घराबाहेर पडण्याचं टाळल्याने वाहतूक कोंडीचा फारसा परिणाम जाणवला नाही. या परिसरात पाणी साचल्याने बेस्ट बसचे मार्गही वळविण्यात आले आहेत.
मेगाब्लॉक रद्द
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेने भायखळा आणि विद्याविहार दरम्यानचा आजचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. पावसामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून हा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक कायम राहणार असल्याचं रेल्वेनं सांगितलं.
पूल झुकला?
घाटकोपर येथे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल झुकल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. अंधेरी- घाटकोपरला जोडणाऱ्या या पुलाची लवकरच डागडूजी करण्यात येणार आहे. तो पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद राहिल, असं सूत्रांनी सांगितलं.
मानखुर्दमध्ये महिलेचा मृत्यू
शनिवारी मानखुर्दच्या पीएमजी कॉलनतीली मोहिते पाटील नगर येथे शॉर्ट लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून एक लहान मुलगी जखमी झाली आहे. उषा सावंत असं या मृत महिलेचं नाव आहे. या महिलेला बाजूच्याच कोळेकर रुग्णालयात नेण्यात आले असता तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. तर या महिलेच्या ५ वर्षाच्या मुलीलाही शॉक लागल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत.
वसईतील पूलही बंद
वसईतील पूर्व-पश्चिमेला जोडणारा जुना अंबाडी पूलही दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. हा पूल अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पावसाचे अपडेट्स:
>> घाटकोपर येथील पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद, पुलाचा काही भाग झुकल्याचा अंदाज
>> मुंबईच्या असल्फा भागात पाणी साचलं
>> वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीचा वेग मंदावला
>> दादर, लालबाग, वरळी भागात जोरदार पाऊस