'मटा हेल्पलाइन' या विद्यार्थी-वाचक उपक्रमाचे यंदाचे अकरावे वर्ष. 'मटा'च्या या उपक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून पाठिंबा दिला आहे. असंख्य गरजू मुलांना मदतीचा हात देणाऱ्या या विधायक उपक्रमाचे महत्त्व विशद करताहेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी...
मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री
'मटा'चे खूप कौतुक वाटते की, त्यांनी गेले एक दशकभर 'बळ द्या पंखांना'सारखा स्तुत्य उपक्रम अविरतपणे राबविला आहे. आपले भविष्य साकारण्यासाठी कित्येक विद्यार्थ्यांना 'मटा हेल्पलाइन'च्या माध्यमातून मदत झाली आहे, ही खूप समाधानाची बाब आहे. आजही आपल्या आजुबाजूला असे अनेक जण आहेत, जे केवळ स्वतःपुरता विचार न करता संपूर्ण समाजाचा विचार करत आहेत. अशा व्यक्तींच्या पुढाकारामध्येच या उपक्रमाचे यश दडलेले आहे.
प्राप्त परस्थितीशी दोन हात करून अनेक विद्यार्थी मोठी झेप घेण्याची स्वप्ने पाहत असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत या मुलांनी जिद्दीने उज्ज्वल यश मिळवले आहे. पण फक्त यश मिळाल्याने सारे काही साध्य होते असे नाही. तर उराशी बाळगलेले स्वप्न साकार करण्यासाठी आर्थिक पाठबळाचीही तितकीच गरज असते. आपल्याकडे असे अनेक गुणवान विद्यार्थी आहेत, ज्यांना या मदतीची गरज असते. अशांना मदत करण्याची आपलीही इच्छा असतेही. म्हणूनच 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'बळ द्या पंखांना' या उपक्रमाद्वारे हा मदतीचा पूल बांधला आहे. गेली दहा वर्षे हा पूल भक्कमपणे उभा आहे, हे विशेष. समाजाच्या मदतीच्या बळावर शिक्षणात येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी या हेल्पलाइनने विद्यार्थ्यांना साथ दिली आहे.
बऱ्याचदा अशा मदतकार्यात ती मदत संबंधितांपर्यंत पोहोचते की नाही, याबाबत शंका मनात असते. पण, या व्रतात 'मटा' खंबीर असल्याने ती निश्चिंती दात्यांनाही मिळते. मदत कुणी किती केली, हे महत्त्वाचे नाही. आपापल्या परीने आपल्याला शक्य आहे, तितका आपल्या ताटातला घास आपण दुसऱ्यासाठी काढून ठेवला, हे जास्त महत्त्वाचे आहे. सामाजिक बांधिलकी म्हणजे तरी दुसरं काय? वेगवेगळ्या वळणांवर, वेगवेगळ्या टप्प्यांवर कुणीतरी कधीतरी आपल्याला वेगवेगळा रूपांत हात दिला, म्हणून आपली वाटचाल काहीशी सोपी झाली, हे लक्षात घ्यायला हवे. आता हात देण्याची आपली वेळ आहे.
मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री
'मटा'चे खूप कौतुक वाटते की, त्यांनी गेले एक दशकभर 'बळ द्या पंखांना'सारखा स्तुत्य उपक्रम अविरतपणे राबविला आहे. आपले भविष्य साकारण्यासाठी कित्येक विद्यार्थ्यांना 'मटा हेल्पलाइन'च्या माध्यमातून मदत झाली आहे, ही खूप समाधानाची बाब आहे. आजही आपल्या आजुबाजूला असे अनेक जण आहेत, जे केवळ स्वतःपुरता विचार न करता संपूर्ण समाजाचा विचार करत आहेत. अशा व्यक्तींच्या पुढाकारामध्येच या उपक्रमाचे यश दडलेले आहे.
प्राप्त परस्थितीशी दोन हात करून अनेक विद्यार्थी मोठी झेप घेण्याची स्वप्ने पाहत असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत या मुलांनी जिद्दीने उज्ज्वल यश मिळवले आहे. पण फक्त यश मिळाल्याने सारे काही साध्य होते असे नाही. तर उराशी बाळगलेले स्वप्न साकार करण्यासाठी आर्थिक पाठबळाचीही तितकीच गरज असते. आपल्याकडे असे अनेक गुणवान विद्यार्थी आहेत, ज्यांना या मदतीची गरज असते. अशांना मदत करण्याची आपलीही इच्छा असतेही. म्हणूनच 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'बळ द्या पंखांना' या उपक्रमाद्वारे हा मदतीचा पूल बांधला आहे. गेली दहा वर्षे हा पूल भक्कमपणे उभा आहे, हे विशेष. समाजाच्या मदतीच्या बळावर शिक्षणात येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी या हेल्पलाइनने विद्यार्थ्यांना साथ दिली आहे.
बऱ्याचदा अशा मदतकार्यात ती मदत संबंधितांपर्यंत पोहोचते की नाही, याबाबत शंका मनात असते. पण, या व्रतात 'मटा' खंबीर असल्याने ती निश्चिंती दात्यांनाही मिळते. मदत कुणी किती केली, हे महत्त्वाचे नाही. आपापल्या परीने आपल्याला शक्य आहे, तितका आपल्या ताटातला घास आपण दुसऱ्यासाठी काढून ठेवला, हे जास्त महत्त्वाचे आहे. सामाजिक बांधिलकी म्हणजे तरी दुसरं काय? वेगवेगळ्या वळणांवर, वेगवेगळ्या टप्प्यांवर कुणीतरी कधीतरी आपल्याला वेगवेगळा रूपांत हात दिला, म्हणून आपली वाटचाल काहीशी सोपी झाली, हे लक्षात घ्यायला हवे. आता हात देण्याची आपली वेळ आहे.