मुंबई
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात दिरंगाई केल्याबद्दल मुंबई हायकोर्टाने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला लक्ष्य केले जाईल या भीतीखाली देशातील पुरोगामी व्यक्ती वावरत आहेत, त्यामुळे दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येची चौकशी निष्पक्षपणे करा, असे खडे बोल आज हायकोर्टाने सीबीआय आणि एसआयटीला सुनावले आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २ ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात हत्या झाल्यानंतर आठ महिन्यांनी १६ फेब्रुवारी २०१५ ला कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात हत्या झाली होती. दोन्ही हत्यांमध्ये साम्य असल्याने यामागे एकाच प्रकारची शक्ती असावी असा संशय डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. दाभोलकर यांची हत्या होऊन पाच वर्षाचा कालावधी लोटला असला तरी तपासात फारशी प्रगती नाही. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी वेळोवेळी राज्य सरकार आणि तपास करणाऱ्या संस्थांला खडेबोल सुनावले आहेत. आज याप्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीत मुंबई हायकोर्टाने सीबीआय आणि एसआयटीला खडे बोल सुनावले आहेत. देशातील पुरोगामी व्यक्ती भीतीखाली वावरत आहेत. त्यामुळे दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येची निष्पक्षपणे चौकशी करा, असे आदेश आज तपास यंत्रणांना हायकोर्टाने दिले आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात दिरंगाई केल्याबद्दल मुंबई हायकोर्टाने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला लक्ष्य केले जाईल या भीतीखाली देशातील पुरोगामी व्यक्ती वावरत आहेत, त्यामुळे दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येची चौकशी निष्पक्षपणे करा, असे खडे बोल आज हायकोर्टाने सीबीआय आणि एसआयटीला सुनावले आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २ ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात हत्या झाल्यानंतर आठ महिन्यांनी १६ फेब्रुवारी २०१५ ला कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात हत्या झाली होती. दोन्ही हत्यांमध्ये साम्य असल्याने यामागे एकाच प्रकारची शक्ती असावी असा संशय डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. दाभोलकर यांची हत्या होऊन पाच वर्षाचा कालावधी लोटला असला तरी तपासात फारशी प्रगती नाही. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी वेळोवेळी राज्य सरकार आणि तपास करणाऱ्या संस्थांला खडेबोल सुनावले आहेत. आज याप्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीत मुंबई हायकोर्टाने सीबीआय आणि एसआयटीला खडे बोल सुनावले आहेत. देशातील पुरोगामी व्यक्ती भीतीखाली वावरत आहेत. त्यामुळे दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येची निष्पक्षपणे चौकशी करा, असे आदेश आज तपास यंत्रणांना हायकोर्टाने दिले आहेत.