मुंबई : भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलावल्यानंतर भाजपने राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. 'हा गुन्हा मुंबईतील सायबर पोलीस ठाण्यात २६ मार्च २०२१ रोजी नोंद झाला आहे. अज्ञात इसमाने सदर तारखेला राज्य गुप्त वार्ता विभागाची गोपनीय पत्र आणि गोपनीय माहिती बेकायदेशीरपणे प्राप्त केली होती. या प्रकरणात ५ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच २४ साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला. गुन्ह्याची उकल करण्याच्या दृष्टीने ज्यांचा-ज्यांचा त्याच्याशी संबंध आहे अशा सगळ्यांचे जबाब घेणं कायद्याने बंधनकारक आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना पहिली नोटीस २१ ऑक्टोबर २०२१ मध्येच देण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी तब्बल पाच ते सहावेळा फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत त्यांचे उत्तर न आल्याने आज पोलिसांनी फडणवीस यांचा जबाब नोंदवला आहे,' असा खुलासा वळसे पाटील यांनी केला आहे. (Devendra Fadanvis News Update)
देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटिसीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आरोपांना उत्तर देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, नोटीस याचा अर्थ समन्स नाही. गुप्त माहिती बाहेर कशी गेली, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांचा जबाब घ्यायचा होता. मात्र फडणवीस यांना याआधी पाठवलेल्या नोटिसीनंतर आणि पाठवलेल्या प्रश्नावलीचे त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं नाही. फक्त एकदा त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की मी याबाबतचे उत्तर लवकरच देईल. मात्र अद्यापपर्यंत फडणवीस यांनी उत्तर न दिल्याने पोलिसांनी आज त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब घेतला,' असं वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या भूमिकेवर टीका
पोलिसांनी फडणवीस यांना नोटीस पाठवल्यानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि नोटीस जाळत विविध ठिकाणी आंदोलन केलं. भाजपच्या या भूमिकेवर गृहमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'एवढा गोंधळ घालण्याची आवश्यकता नव्हती. हे प्रकरण जवळपास एक वर्ष जुनं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या जबाबामुळे या प्रकरणाचा तपास थांबला होता,' असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटिसीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आरोपांना उत्तर देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, नोटीस याचा अर्थ समन्स नाही. गुप्त माहिती बाहेर कशी गेली, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांचा जबाब घ्यायचा होता. मात्र फडणवीस यांना याआधी पाठवलेल्या नोटिसीनंतर आणि पाठवलेल्या प्रश्नावलीचे त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं नाही. फक्त एकदा त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की मी याबाबतचे उत्तर लवकरच देईल. मात्र अद्यापपर्यंत फडणवीस यांनी उत्तर न दिल्याने पोलिसांनी आज त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब घेतला,' असं वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या भूमिकेवर टीका
पोलिसांनी फडणवीस यांना नोटीस पाठवल्यानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि नोटीस जाळत विविध ठिकाणी आंदोलन केलं. भाजपच्या या भूमिकेवर गृहमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'एवढा गोंधळ घालण्याची आवश्यकता नव्हती. हे प्रकरण जवळपास एक वर्ष जुनं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या जबाबामुळे या प्रकरणाचा तपास थांबला होता,' असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.