सत्तापालट;ट्रायडेंटमध्ये लिहिलं गेलं स्क्रीप्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यात मंगळवारी सकाळी ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक झाली. हीच बैठक चार दिवसांपूर्वीच्या फडणवीस सरकार कोसळण्याची पटकथा लिहित होती. कारण, यानंतर काही तासातच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांनीच राजीनामा दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीही काही तासात पत्रकार परिषद घेतली आणि राजीनामा देत असल्याची घोषणा केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2019, 7:25 pm
हायलाइट्स:
- शरद पवार आणि अजित पवार यांच्या ट्रायडेंटमध्ये बैठक झाली
- प्रफुल पटेलांनी याच बैठकीत अजित पवारांचं मन वळवल्याची माहिती आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यात मंगळवारी सकाळी ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक झाली. हीच बैठक चार दिवसांपूर्वीच्या फडणवीस सरकार कोसळण्याची पटकथा लिहित होती. कारण, यानंतर काही तासातच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांनीच राजीनामा दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीही काही तासात पत्रकार परिषद घेतली आणि राजीनामा देत असल्याची घोषणा केली. फडणवीसांचा राजीनामा; ८० तासांत पायउतार
सूत्रांच्या माहितीनुसार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नवीन गटनेते जयंत पाटील आणि राज्यसभा खासदार प्रफुल पटेलही बैठकीला उपस्थित होते. या सर्व नेत्यांच्या समक्ष काक-पुतण्यांची बैठक झाली. राष्ट्रवादीच्या या सर्व दिग्गज नेत्यांनी अजित पवारांचं मन वळवल्याचं मानलं जातं आणि पुन्हा आल्यास तेच स्थान दिलं जाईल, याचीही ग्वाही दिल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरेच पुढचे मुख्यमंत्री : नवाब मलिक
अजित पवार यांनी एकतर राजीनामा द्यावा, किंवा बहुमत चाचणीच्या वेळी अनुपस्थित रहावं, हे दोन पर्याय शरद पवारांनी ठेवल्याची माहिती आहे. शरद पवारांनीच राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना अजित पवारांचं मन वळवण्यासाठी पाच वेळा त्यांच्या निवासस्थानी पाठवलं होतं. कारण, अजित पवार परत येतील याचा विश्वास शरद पवारांना होता.
नवनिर्वाचित आमदारांचा उद्या शपथविधी होणार
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला, त्याचवेळी शरद पवारांनी हसन मुश्रीफ, जयंत पाटील आणि सुनिल तटकरे यांना अजित पवारांची भेट घेण्यास सांगितलं. शनिवारी आणि रविवारीही शरद पवारांनी छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांना अजितदादांसोबत चर्चा करण्यासाठी पाठवलं. या नेत्यांनी अजितदादांना निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला.
प्रफुल पटेल यांची मध्यस्थी यशस्वी
राष्ट्रवादीचे नेते अजितदादांचं मन वळवत होतेच. पण शरद पवारांचे निकटवर्तीय प्रफुल पटेल यांना यात अखेर यश आलं. मंगळवारी ट्रायडेंट हॉटेलमधील बैठकीनंतर अजित पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि चार दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांनाही राजीनामा द्यावा लागला.
अजित पवारांनी राजीनामा दिला, भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे राजीनामा देत आहे, अशी हतबलता फडणवीसांनी बोलून दाखवली. सुप्रीम कोर्टाने तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यामुळे भाजपच्या सर्व आशा मावळल्या. बहुमत सिद्ध करताना गुप्त मतदानाऐवजी त्याचं थेट प्रक्षेपण व्हावं, असंही कोर्टाने सांगितलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नवीन गटनेते जयंत पाटील आणि राज्यसभा खासदार प्रफुल पटेलही बैठकीला उपस्थित होते. या सर्व नेत्यांच्या समक्ष काक-पुतण्यांची बैठक झाली. राष्ट्रवादीच्या या सर्व दिग्गज नेत्यांनी अजित पवारांचं मन वळवल्याचं मानलं जातं आणि पुन्हा आल्यास तेच स्थान दिलं जाईल, याचीही ग्वाही दिल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरेच पुढचे मुख्यमंत्री : नवाब मलिक
अजित पवार यांनी एकतर राजीनामा द्यावा, किंवा बहुमत चाचणीच्या वेळी अनुपस्थित रहावं, हे दोन पर्याय शरद पवारांनी ठेवल्याची माहिती आहे. शरद पवारांनीच राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना अजित पवारांचं मन वळवण्यासाठी पाच वेळा त्यांच्या निवासस्थानी पाठवलं होतं. कारण, अजित पवार परत येतील याचा विश्वास शरद पवारांना होता.
नवनिर्वाचित आमदारांचा उद्या शपथविधी होणार
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला, त्याचवेळी शरद पवारांनी हसन मुश्रीफ, जयंत पाटील आणि सुनिल तटकरे यांना अजित पवारांची भेट घेण्यास सांगितलं. शनिवारी आणि रविवारीही शरद पवारांनी छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांना अजितदादांसोबत चर्चा करण्यासाठी पाठवलं. या नेत्यांनी अजितदादांना निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला.
प्रफुल पटेल यांची मध्यस्थी यशस्वी
राष्ट्रवादीचे नेते अजितदादांचं मन वळवत होतेच. पण शरद पवारांचे निकटवर्तीय प्रफुल पटेल यांना यात अखेर यश आलं. मंगळवारी ट्रायडेंट हॉटेलमधील बैठकीनंतर अजित पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि चार दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांनाही राजीनामा द्यावा लागला.
अजित पवारांनी राजीनामा दिला, भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे राजीनामा देत आहे, अशी हतबलता फडणवीसांनी बोलून दाखवली. सुप्रीम कोर्टाने तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यामुळे भाजपच्या सर्व आशा मावळल्या. बहुमत सिद्ध करताना गुप्त मतदानाऐवजी त्याचं थेट प्रक्षेपण व्हावं, असंही कोर्टाने सांगितलं.