अ‍ॅपशहर

वारिस पठाण म्हणतात, मी असं बोललोच नाही!

एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या प्रक्षोभक वक्तव्यावरून वादळ उठलेले असताना व पक्षनेतृत्वाकडून त्यांना सज्जड दम भरण्यात आलेला असताना 'मी असं काही बोललोच नाही' असा पवित्रा आता पठाण यांनी घेतला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Feb 2020, 8:47 pm
मुंबई: एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या प्रक्षोभक वक्तव्यावरून वादळ उठलेले असताना व पक्षनेतृत्वाकडून त्यांना सज्जड दम भरण्यात आलेला असताना 'मी असं काही बोललोच नाही' असा पवित्रा आता पठाण यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम waris-pathan


कर्नाटकातील गुलबर्गा येथे नागरिकत्व कायद्याविरुद्ध आयोजित सभेत बोलताना वारिस पठाण यांनी '१५ कोटी मुस्लिम १०० कोटी हिंदूंवर भारी पडतील' असं विधान केलं होतं. या विधानावरून देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. खुद्द एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही नाराजी व्यक्त करत राष्ट्रीय प्रवक्ते असलेल्या पठाण यांना माध्यमांशी बोलण्यास बंदी घातली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पठाण यांनी बॅकफूटवर जात 'मी असं काही बोललोच नाही' असं म्हणून सारवासारव केली आहे. 'मी माफी मागणार नाही', अशी सुरुवातीला भूमिका घेणाऱ्या पठाण यांनी निवेदन जारी करून माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे खापर माध्यमांवर फोडले आहे.

ओवेसींनी केली वारिस पठाण यांची बोलती बंद

गुलबर्गा येथील पाच दिवसांपूर्वीच्या कार्यक्रमातील माझ्या भाषणाचा काही भाग माध्यमांमध्ये दाखवण्यात येत आहे. हा पूर्णपणे माझ्या विधानाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आहे. एखाद्या जातीच्या, धर्माच्या वा पंथाच्या भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य जाणतेपणे वा अजाणतेपणे मी कधीही केलेले नाही व करणार नाही. मी भारतीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि या देशातील विविधतेचा मी नेहमीच आदर केलेला आहे, असे पठाण यांनी नमूद केले.

१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी: पठाण

देशात नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) याविरुद्ध शांततेच्या मार्गाने निदर्शने केली जात आहेत. मात्र, त्याकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष केले जात आहे त्यावर माझा आक्षेप आहे. देशाच्या संविधानावर विश्वास असणाऱ्या अनेक नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. मी त्यापैकीच एक आहे, असे पठाण यांनी नमूद केले.

जात, पंथ आणि धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या कोणत्याही कृतीचे मी वा माझा पक्ष कधीही समर्थन करणार नाही, असेही पठाण यांनी पुढे स्पष्ट केले आहे. पठाण यांनी निवेदनाच्या शेवटी 'जय हिंद' लिहिलं आहे.

मशीद तोडणाऱ्यांना पुरस्कार : असदुद्दीन ओवैसी

काय म्हणाले होते वारिस पठाण?

वारिस पठाण यांचा कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाषणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या भाषणात अत्यंत प्रक्षोभक भाषा त्यांनी वापरली आहे. 'आता आमचा महिलावर्ग...वाघिणी बाहेर पडल्यात तर तुम्हाला घाम फुटलाय...भविष्यात आम्ही सगळेच रस्त्यावर उतरलो तर काय होईल, याची कल्पना करा. आम्ही फक्त १५ कोटी आहोत पण निश्चितच १०० कोटींवर आम्ही भारी पडू. स्वातंत्र्य मिळणार नसेल तर ते आम्हाला हिसकावून घ्यावं लागेल', असा इशारा पठाण यांनी दिला आहे. पठाण यांच्या याच विधानावरून वादळ उठले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज