मुंबईः विधिमंडळात भाजप बहुमत सिद्ध करू शकला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करेल, असं पक्षाचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय. सत्ता स्थापनेवरून शिवसेना-भाजपमध्ये तिढा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मिलक बोलत होते. विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. पण मुख्यमंत्री पद आणि सत्तेतील ५०-५० च्या सूत्रावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद वाढतच चाललाय. यामुळे ५४ जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 'विधानसभेत भाजप बहुमत सिद्ध करू शकला नाही आणि सरकार पडले तर राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायी सरकार स्थापन करण्याचा विचार करेल', असं नवाब मलिक म्हणालेत. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सत्ता स्थापनेबाबत हे वक्तव्य केलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाचे सर्व आमदार आणि वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. आता या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेते याकडेही लक्ष लागलं आहे.
भाजप-शिवसेनेमध्ये वाटाघाटीवरून सत्ता स्थापनेचा तिढा वाढतच चाललाय. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून चाचपणीचे प्रयत्न सुरू झालेत. विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटकर फोटो शेअर केला होता. या फोटोत वाघाच्या गळ्यात 'घड्याळ' आणि हातात 'कमळ' होतं. तसंच काँग्रेसनेही शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी केलीय. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता आहे. भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का? यावरून चर्चा रंगल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस शुक्रवारपर्यंत घेणार शपथ?
नवाब मलिक म्हणाले...
निवडणुकीच्या निकालात १०५ जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विरोधीपक्षात बसण्याची आमची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपने सत्ता स्थापन करावी. पण विधिमंडळात बहुमत सिद्ध करताना शिवसेनेने भाजपविरोधी भूमिका घेतली आणि सरकार पडले तर पर्यायी सरकारचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस करेल, असं नवाब मलिक म्हणाले.
'आठवलेंना CM करा, पण सरकार स्थापन करा'
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाचे सर्व आमदार आणि वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. आता या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेते याकडेही लक्ष लागलं आहे.
भाजप-शिवसेनेमध्ये वाटाघाटीवरून सत्ता स्थापनेचा तिढा वाढतच चाललाय. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून चाचपणीचे प्रयत्न सुरू झालेत. विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटकर फोटो शेअर केला होता. या फोटोत वाघाच्या गळ्यात 'घड्याळ' आणि हातात 'कमळ' होतं. तसंच काँग्रेसनेही शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी केलीय. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता आहे. भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का? यावरून चर्चा रंगल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस शुक्रवारपर्यंत घेणार शपथ?
नवाब मलिक म्हणाले...
निवडणुकीच्या निकालात १०५ जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विरोधीपक्षात बसण्याची आमची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपने सत्ता स्थापन करावी. पण विधिमंडळात बहुमत सिद्ध करताना शिवसेनेने भाजपविरोधी भूमिका घेतली आणि सरकार पडले तर पर्यायी सरकारचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस करेल, असं नवाब मलिक म्हणाले.
'आठवलेंना CM करा, पण सरकार स्थापन करा'