अ‍ॅपशहर

राणे भाजपात गेल्यास शिवसेना सत्तेबाहेर?

राज्यात राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे. एकीकडे काँग्रेस नेते नारायण राणे सिंधुदुर्गात शक्तिप्रदर्शन करत असताना मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आमदार, खासदार आणि सेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक घेतली. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध जोडल्यास राणे यांनी सिमोल्लंघन करून भाजपमध्ये प्रवेश केला तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेईल, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Maharashtra Times 18 Sep 2017, 4:39 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम if narayan rane joins bjp shivsena will withdraw state government support
राणे भाजपात गेल्यास शिवसेना सत्तेबाहेर?


राज्यात राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे. एकीकडे काँग्रेस नेते नारायण राणे सिंधुदुर्गात शक्तिप्रदर्शन करत असताना मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आमदार, खासदार आणि सेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक घेतली. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध जोडल्यास राणे यांनी सिमोल्लंघन करून भाजपमध्ये प्रवेश केला तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेईल, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेनेच्या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी 'सरकारचे काय करायचे? याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत आणि ती वेळ जवळ आली आहे', असे सूचक ट्विट केले आहे. पेट्रोल-डिझेलचे भडकलेले दर, वाढती महागाई आणि विझत चाललेल्या गरिबांच्या चुली या पापाचे धनी शिवसेनेला व्हायचे नाही, असे कारणही राऊत यांनी पुढे केले आहे. मात्र प्रत्यक्षात नारायण राणे यांनी दसऱ्याआधी सीमोल्लंघन करण्याचे दिलेले संकेत हे शिवसेनेच्या तातडीच्या बैठकीमागचे खरे कारण असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

राणे यांना विश्वासात न घेता काँग्रेस नेतृत्वाने सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याने राणे टोकाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राणे यांनी माध्यमांशी बोलताना सीमोल्लंघनाचे स्पष्ट संकेत दिले आहेत तसेच राणे आज सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन करत आहेत. गोवा विमानतळावर उतरल्यानंतर तिथून कुडाळपर्यंत राणे यांनी जोरदार शक्तप्रदर्शन केलं. सुमारे दोनशे गाड्यांचा ताफा राणे यांच्या शक्तिप्रदर्शनात होता. त्यामुळे राणे आज काय बोलणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, राणे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यास शिवसेना भाजपची सोथ सोडेल, असे स्पष्ट संकेत शिवसेना नेतृत्वाकडून देण्यात आले आहेत. जिथे राणे सत्तेत आहेत तिथे त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत राहायचे नाही. शिवसेनेशी गद्दारी करून दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना ज्यांनी दुखावलं त्या राणेंना कोणत्याही स्थितीत माफ करायचे नाही, अशी भूमिका वेळोवेळी उद्धव यांनी मांडलेली आहे. आता राणेंनी निर्णय घेतल्यास त्यासोबत शिवसेनेचाही निर्णय होईल. अशा स्थितीत राज्यातील सरकारचे काय होणार?, शिवसेनेने पाठिंबा काढल्यास सरकार पडणार की सरकारला अन्य पक्षाचा (राष्ट्रवादीचा) टेकू मिळणार?, पुन्हा मंत्री होण्याचे राणेंचे स्वप्न अधुरेच राहणार का?, असे अनेक प्रश्न या निमित्ताने राज्याच्या राजकीय पटलावर तयार झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज