म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
पवई आयआयटीमध्ये शिकणाऱ्या बावीस वर्षाच्या जयदीप स्वेन हा विद्यार्थी सोमवारी जोगेश्वरीच्या त्रिबो हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडला. जयदीप ज्या रूममध्ये होता तिथे काही गोळ्या सापडल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
मूळचा छत्तीसगडचा असलेला जयदीप जुलैपासून आयआयटीमध्ये एमटेक शिकत होता. ३१ ऑगस्ट रोजी त्याने जोगेश्वरी पश्चिमेकडील त्रिबो हॉटेलमध्ये रूम बुक केली. तेव्हापासून तो तिथेच राहत होता. 'मला कोणी डिस्टर्ब करू नका', असे त्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगितले होते. सोमवारी त्याच्या रूममधून दुर्गंधी येऊ लागली. जयदीप दरवाजा उघडत नव्हता, तसेच फोनही उचलत नव्हता. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी दरवाजा तोडला त्यावेळी जयदीप मृतावस्थेत सापडला. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवला आहे.
जयदीप तणावाखाली होता. त्याच्या रूममध्ये तणाव निवारणासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांची पाकिटे सापडली. गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज असून शव विच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे आंबोली पोलिसांनी सांगितले.
पवई आयआयटीमध्ये शिकणाऱ्या बावीस वर्षाच्या जयदीप स्वेन हा विद्यार्थी सोमवारी जोगेश्वरीच्या त्रिबो हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडला. जयदीप ज्या रूममध्ये होता तिथे काही गोळ्या सापडल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
मूळचा छत्तीसगडचा असलेला जयदीप जुलैपासून आयआयटीमध्ये एमटेक शिकत होता. ३१ ऑगस्ट रोजी त्याने जोगेश्वरी पश्चिमेकडील त्रिबो हॉटेलमध्ये रूम बुक केली. तेव्हापासून तो तिथेच राहत होता. 'मला कोणी डिस्टर्ब करू नका', असे त्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगितले होते. सोमवारी त्याच्या रूममधून दुर्गंधी येऊ लागली. जयदीप दरवाजा उघडत नव्हता, तसेच फोनही उचलत नव्हता. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी दरवाजा तोडला त्यावेळी जयदीप मृतावस्थेत सापडला. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवला आहे.
जयदीप तणावाखाली होता. त्याच्या रूममध्ये तणाव निवारणासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांची पाकिटे सापडली. गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज असून शव विच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे आंबोली पोलिसांनी सांगितले.