म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात एकीकडे तापमान वाढत असतानाच नाशिक, धुळे, औरंगाबाद, जालना आदी भागांमध्ये पुढील चोवीस तासात गारपीट होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
राज्याच्या काही भागांत हवामानबदल होत असून, काही भागांत तापमानात चढ-उतार होत आहेत. मात्र, पुढील चोवीस तासांत उत्तर मध्य महाराष्ट्रात, खास करून नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव; तसेच, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत गडगडाटासह पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील महिन्यात राज्याच्या काही भागांत प्रचंड गारपीट होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. हवामान खात्याने पुन्हा गारपिटीचा इशारा दिल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
उष्मा वाढतोच आहे
पुढील काही दिवसांत राज्यातील कमाल तापमान चढेच राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस उकाडा कायम राहील, अशी चिन्हे आहेत. बुधवारी राज्यात रायगड जिल्ह्यातील भिरा येथे कमाल तापमान सर्वाधिक म्हणजे ४१ अंश सेल्सिअस इतके होते. गेल्या काही दिवसांपासून भिरा येथील तापमान चढेच आहे. त्याखालोखाल सोलापूरमध्ये ३९ अंश से., नांदेड व अकोला येथे ३८ आणि सांगली, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूरमध्ये कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. मुंबईत कुलाबा येथे कमाल तापमान ३१.४ तर सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. पुढील ४८ तासांत मुंबईतील आकाश ढगाळलेले राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात एकीकडे तापमान वाढत असतानाच नाशिक, धुळे, औरंगाबाद, जालना आदी भागांमध्ये पुढील चोवीस तासात गारपीट होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
राज्याच्या काही भागांत हवामानबदल होत असून, काही भागांत तापमानात चढ-उतार होत आहेत. मात्र, पुढील चोवीस तासांत उत्तर मध्य महाराष्ट्रात, खास करून नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव; तसेच, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत गडगडाटासह पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील महिन्यात राज्याच्या काही भागांत प्रचंड गारपीट होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. हवामान खात्याने पुन्हा गारपिटीचा इशारा दिल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
उष्मा वाढतोच आहे
पुढील काही दिवसांत राज्यातील कमाल तापमान चढेच राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस उकाडा कायम राहील, अशी चिन्हे आहेत. बुधवारी राज्यात रायगड जिल्ह्यातील भिरा येथे कमाल तापमान सर्वाधिक म्हणजे ४१ अंश सेल्सिअस इतके होते. गेल्या काही दिवसांपासून भिरा येथील तापमान चढेच आहे. त्याखालोखाल सोलापूरमध्ये ३९ अंश से., नांदेड व अकोला येथे ३८ आणि सांगली, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूरमध्ये कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. मुंबईत कुलाबा येथे कमाल तापमान ३१.४ तर सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. पुढील ४८ तासांत मुंबईतील आकाश ढगाळलेले राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.