म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईकरांना आज, शुक्रवारपासून चार दिवस पावसाची संततधार अनुभवता येऊ शकते. तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो. मुंबईसाठी २६ जुलै हा आठवणीत राहणारा दिवस आहे. या दिवसासाठी काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला असून रविवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
गुरुवारीही मुंबईकरांनी अधून मधून जोरदार सरींचा अनुभव घेतला. सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या कालावधीमध्ये सांताक्रूझ येथे २६.४ मिलीमीटर तर कुलाबा येथे ११.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी पावसाचा जोर थोडा कमी झाला होता. मात्र हा जोर पुन्हा शुक्रवारी वाढू शकतो असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. शहरामध्ये संध्याकाळी काही काळ जोरदार सरी कोसळल्या. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. ठाणे, नवी मुंबईमध्ये मात्र शुक्रवारी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या कालावधीमध्ये नौपाडा, दौलत नगर, मुंब्रा, कोपरखैरणे येथे ४० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. भांडुप येथेही ४० मिलीमीटरहून अधिक पाऊस नोंदला गेला. पालघर जिल्ह्यासाठी मात्र शुक्रवार २६ जुलैसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघरमध्ये एखाद-दुसऱ्या ठिकाणी अति तीव्र पावसाची शक्यता आहे. हीच परिस्थिती रविवारीही उद्भवू शकते. ठाणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता शुक्रवारी आणि शनिवारी शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या मॉडेलनुसार ३० जुलैपर्यंत मुंबई आणि कोकणामध्ये पावसाची तीव्रता कायम राहू शकते. ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी हा जोर थोडा कमी होण्याचा अंदाज आहे.
देशात काय स्थिती
हवामान विभागाने गुरुवारी पुढील दोन आठवड्यांसाठीचे पूर्वानुमान जारी केले. या माहितीनुसार देशाच्या बहुतांश भागांमध्ये पुढील दोन आठवड्यात साप्ताहिक सरासरीपेक्षा पाऊस जास्त पडण्याचा अंदाज आहे. देशाच्या साप्ताहिक सरासरीपेक्षा ३५ टक्क्यांनी पाऊस कमी पडला. १ जूनपासूनच्या सरासरीनुसार देशात अजून १९ टक्के पाऊस कमी आहे तर मध्य भारतात २२ टक्क्यांनी पावसाची तूट आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात ११ टक्के, दक्षिण द्वीपकल्पात २१ टक्के आणि वायव्य भारतातही पावसाची अजून २१ टक्के तूट आहे. येत्या आठवड्यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब येथे काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो तर १ ते ७ ऑगस्ट दरम्यान मध्य भारतात साप्ताहिक सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
मुंबईकरांना आज, शुक्रवारपासून चार दिवस पावसाची संततधार अनुभवता येऊ शकते. तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो. मुंबईसाठी २६ जुलै हा आठवणीत राहणारा दिवस आहे. या दिवसासाठी काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला असून रविवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
गुरुवारीही मुंबईकरांनी अधून मधून जोरदार सरींचा अनुभव घेतला. सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या कालावधीमध्ये सांताक्रूझ येथे २६.४ मिलीमीटर तर कुलाबा येथे ११.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी पावसाचा जोर थोडा कमी झाला होता. मात्र हा जोर पुन्हा शुक्रवारी वाढू शकतो असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. शहरामध्ये संध्याकाळी काही काळ जोरदार सरी कोसळल्या. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. ठाणे, नवी मुंबईमध्ये मात्र शुक्रवारी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या कालावधीमध्ये नौपाडा, दौलत नगर, मुंब्रा, कोपरखैरणे येथे ४० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. भांडुप येथेही ४० मिलीमीटरहून अधिक पाऊस नोंदला गेला. पालघर जिल्ह्यासाठी मात्र शुक्रवार २६ जुलैसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघरमध्ये एखाद-दुसऱ्या ठिकाणी अति तीव्र पावसाची शक्यता आहे. हीच परिस्थिती रविवारीही उद्भवू शकते. ठाणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता शुक्रवारी आणि शनिवारी शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या मॉडेलनुसार ३० जुलैपर्यंत मुंबई आणि कोकणामध्ये पावसाची तीव्रता कायम राहू शकते. ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी हा जोर थोडा कमी होण्याचा अंदाज आहे.
देशात काय स्थिती
हवामान विभागाने गुरुवारी पुढील दोन आठवड्यांसाठीचे पूर्वानुमान जारी केले. या माहितीनुसार देशाच्या बहुतांश भागांमध्ये पुढील दोन आठवड्यात साप्ताहिक सरासरीपेक्षा पाऊस जास्त पडण्याचा अंदाज आहे. देशाच्या साप्ताहिक सरासरीपेक्षा ३५ टक्क्यांनी पाऊस कमी पडला. १ जूनपासूनच्या सरासरीनुसार देशात अजून १९ टक्के पाऊस कमी आहे तर मध्य भारतात २२ टक्क्यांनी पावसाची तूट आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात ११ टक्के, दक्षिण द्वीपकल्पात २१ टक्के आणि वायव्य भारतातही पावसाची अजून २१ टक्के तूट आहे. येत्या आठवड्यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब येथे काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो तर १ ते ७ ऑगस्ट दरम्यान मध्य भारतात साप्ताहिक सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.