म. टा. प्रतिनिधी मुंबई: १५ एप्रिलपासूनच्या निर्बंधांनंतर मुंबईतील करोना स्थिती काहीशी नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. त्यामुळेच करोना आटोक्यात आणण्यासाठी एकदाच कडक लॉकडाउन करा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याची स्थिती भयावह होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यातून मुंबई हे राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असल्याने येथेही करोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढती होती. या स्थितीचा सामना करण्यासाठी मुंबईसह राज्यात निर्बंध जारी करण्यात आले. त्याचे काहीसे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळेच आता एकदाच कडक लॉकडाउन करून ही साथ पूर्णपणे नियंत्रणात आणा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात अखिल भारतीय व्यापारी महासंघाने राज्य व केंद्र सरकारलाही पत्र लिहिले आहे. संघटनेनुसार सध्याचे निर्बंध हे अर्धवट स्वरूपातील आहेत. या निर्बंधांमुळे करोना स्थिती फार थोडी नियंत्रणात येत आहे. पण व्यापारीवर्ग व त्यांच्या व्यवसायाचे मात्र भीषण नुकसान होत आहे. हे निर्बंध असेच कायम राहिल्यास करोना पूर्ण नियंत्रणात येण्यास वेळ लागेल. पण त्यादरम्यान व्यावसायिकांचे भीषण नुकसान होईल. त्यातून भविष्यात वेगळ्या समस्या निर्माण होतील. त्यामुळे याऐवजी किमान मुंबई शहर व उपनगरात एकदाच कडक लॉकडाउन लावला जावा. जेणेकरून त्यातून करोना नियंत्रणात येईल व त्यानंतर व्यापारी त्यांचा व्यवसाय सुरळीत करू शकतील.
दीड लाख व्यापाऱ्यांना फटका
मुंबई शहर व उपनगरात जवळपास दीड लाख व्यापारी आहेत. त्यातील अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांचा आकडा जेमतेम १० टक्के आहे. ९० टक्के व्यवसाय ठप्प आहे. त्यातही किरकोळ व्यापारीच अधिक आहेत. त्यातून व्यावसायिकांना विविध प्रकारच्या करांचा भरणा करण्यासह वीज देयके, महापालिकेचे कर, कर्मचाऱ्यांचा पगार आदी सर्व खर्च असतो. त्यामुळेच नुकसान मोठे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याची स्थिती भयावह होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यातून मुंबई हे राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असल्याने येथेही करोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढती होती. या स्थितीचा सामना करण्यासाठी मुंबईसह राज्यात निर्बंध जारी करण्यात आले. त्याचे काहीसे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळेच आता एकदाच कडक लॉकडाउन करून ही साथ पूर्णपणे नियंत्रणात आणा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात अखिल भारतीय व्यापारी महासंघाने राज्य व केंद्र सरकारलाही पत्र लिहिले आहे. संघटनेनुसार सध्याचे निर्बंध हे अर्धवट स्वरूपातील आहेत. या निर्बंधांमुळे करोना स्थिती फार थोडी नियंत्रणात येत आहे. पण व्यापारीवर्ग व त्यांच्या व्यवसायाचे मात्र भीषण नुकसान होत आहे. हे निर्बंध असेच कायम राहिल्यास करोना पूर्ण नियंत्रणात येण्यास वेळ लागेल. पण त्यादरम्यान व्यावसायिकांचे भीषण नुकसान होईल. त्यातून भविष्यात वेगळ्या समस्या निर्माण होतील. त्यामुळे याऐवजी किमान मुंबई शहर व उपनगरात एकदाच कडक लॉकडाउन लावला जावा. जेणेकरून त्यातून करोना नियंत्रणात येईल व त्यानंतर व्यापारी त्यांचा व्यवसाय सुरळीत करू शकतील.
दीड लाख व्यापाऱ्यांना फटका
मुंबई शहर व उपनगरात जवळपास दीड लाख व्यापारी आहेत. त्यातील अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांचा आकडा जेमतेम १० टक्के आहे. ९० टक्के व्यवसाय ठप्प आहे. त्यातही किरकोळ व्यापारीच अधिक आहेत. त्यातून व्यावसायिकांना विविध प्रकारच्या करांचा भरणा करण्यासह वीज देयके, महापालिकेचे कर, कर्मचाऱ्यांचा पगार आदी सर्व खर्च असतो. त्यामुळेच नुकसान मोठे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.