म. टा. प्रतिनिधी, मुंबई
लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवहारांना खीळ बसली आहे. यामुळे या काळात परदेशी चलनाचा गैरवापर वाढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष तपास सुरू केला असून, याअंतर्गत अलिकडेच औरंगाबादहून सोन्याच्या विटा व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
आर्थिक व्यवहार खोळंबल्यामुळे काळ्या पैशांची उलाढाल करणाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. यामुळे या क्षेत्रातील दलालांनी आता परदेशी चलनाचा गैरवापर सुरू केला आहे. त्यामुळे मुंबईतील विभागीय मुख्यालयाने अशा व्यवहारांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गतच अलिकडे औरंगबादमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. यानुसार विभागांतर्गत आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
'ईडी'तील सूत्रांनुसार, अलिकडे केलेल्या कारवाईत ६२ लाख रुपयांची रोकड व सात किलो सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्या. परदेशी चलनाच्या गैरवापराद्वारे ही रक्कम व सोने साठवण्यात आले होते. त्यामुळे परदेशी चलन विनिमय व्यवस्थापन कायद्यांतर्गत (फेमा) ही कारवाई करण्यात आली आहे.
लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवहारांना खीळ बसली आहे. यामुळे या काळात परदेशी चलनाचा गैरवापर वाढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष तपास सुरू केला असून, याअंतर्गत अलिकडेच औरंगाबादहून सोन्याच्या विटा व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
आर्थिक व्यवहार खोळंबल्यामुळे काळ्या पैशांची उलाढाल करणाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. यामुळे या क्षेत्रातील दलालांनी आता परदेशी चलनाचा गैरवापर सुरू केला आहे. त्यामुळे मुंबईतील विभागीय मुख्यालयाने अशा व्यवहारांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गतच अलिकडे औरंगबादमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. यानुसार विभागांतर्गत आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
'ईडी'तील सूत्रांनुसार, अलिकडे केलेल्या कारवाईत ६२ लाख रुपयांची रोकड व सात किलो सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्या. परदेशी चलनाच्या गैरवापराद्वारे ही रक्कम व सोने साठवण्यात आले होते. त्यामुळे परदेशी चलन विनिमय व्यवस्थापन कायद्यांतर्गत (फेमा) ही कारवाई करण्यात आली आहे.