म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
बदलती जीवनशैली, प्रदूषण, व्यसनाधीनता या बाह्य घटकांसह अंतर्गत आजार, संसर्गामुळे दहा ते बारा टक्के महिलांमध्ये स्त्रीबीजकोषाचे कार्य विस्कळीत झाले आहे. हे कार्य बिघडल्यामुळे पुनरुत्पादनासाठी गरजेच्या असणाऱ्या स्त्रीबीजाच्या निर्मितीमध्येही अडसर निर्माण होताना दिसत आहे. वंध्यत्वाच्या वाढत्या तक्रारी, वाढते वजन आणि वजनाशी संबधित इतर आजारांची गुंतागुंत स्त्रीबीजकोषाचे कार्य बिघडलेल्या या स्त्रियांमध्ये दिसून येते. इन्स्टिट्यूट फॉर सोशल अण्ड इकॉनॉमिकल चेंज यांच्या मते भारतातील अंदाजे दोन टक्के महिलांमध्ये २८ ते ३४ या वयोगटामध्ये रजोनिवृत्ती होताना दिसते, तर ३५ ते ३९ या वयोगटामध्ये हे प्रमाण ८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
स्त्रीबीजकोष निकामी झाला की त्यातील इस्ट्रोजन हार्मोन्सचे प्रमाण कमी होते. किंवा त्यात इस्ट्रोजनची निर्मिती केली जात नाही. बीजनिर्मिती न झाल्यामुळे फलनाच्या प्रक्रियेस अडसर निर्माण होतो. स्त्रियांमधील पुनरुत्पादनाची क्षमता कमी होते व त्यांना गर्भधारणा होणे कठीण होते. रजोनिवृत्तीच्या काळात जी लक्षणे दिसतात, तीच लक्षणे या महिलांमध्ये दिसून येतात, याकडे डॉ. सुलभा अरोरा यांनी मुंबईत झालेल्या चर्चासत्रामध्ये लक्ष वेधले.
पीओएफसाठी कोणतेही ठोस वैद्यकीय उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे इस्ट्रोजन पातळीमध्ये घट होत असल्याने संप्रेरकांमधील बदलांवर उपचार करता येतात. मात्र स्त्रीबीजकोषाची अकार्यक्षमता दुरुस्त करता येत नाही. गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर सल्ला न घेता मनमानीपणे केला तर त्याचे दुष्परिणाम होतात. गर्भाशयाची शस्त्रक्रिया, कर्करोगावर मात करण्यासाठी घेण्यात येणारी थेरपी वा काही प्रमाणात अनुवांशिकतेमुळेही स्त्रीबीजकोष लवकर अकार्यक्षम होतात. पर्यावरणातील आरोग्यासाठी हानीकारक घटकांच्या संसर्गामुळेही लवकर रजोनिवृत्ती येण्याचा त्रास संभवतो.
लक्षणे
तारुण्यामध्येच मासिक पाळी जाण्याची लक्षणे जाणवतात. मासिक पाळी अनियमित होते. रजोनिवृत्तीमध्ये ज्या प्रकारे लक्षणे दिसतात तशीच लक्षणे दिसू लागतात. झोप लागत नाही, घाम येतो, रात्रीअपरात्री दचकून जाग येते. स्वभाव चिडचिडा होतो. मूत्राशयावर नियंत्रण राहत नाही. एन्डोमेट्रॉसिससारख्या वैद्यकीय समस्येमध्येही स्त्रीबीजकोष अकार्यक्षम होण्याची शक्यता असते.
बदलती जीवनशैली, प्रदूषण, व्यसनाधीनता या बाह्य घटकांसह अंतर्गत आजार, संसर्गामुळे दहा ते बारा टक्के महिलांमध्ये स्त्रीबीजकोषाचे कार्य विस्कळीत झाले आहे. हे कार्य बिघडल्यामुळे पुनरुत्पादनासाठी गरजेच्या असणाऱ्या स्त्रीबीजाच्या निर्मितीमध्येही अडसर निर्माण होताना दिसत आहे. वंध्यत्वाच्या वाढत्या तक्रारी, वाढते वजन आणि वजनाशी संबधित इतर आजारांची गुंतागुंत स्त्रीबीजकोषाचे कार्य बिघडलेल्या या स्त्रियांमध्ये दिसून येते. इन्स्टिट्यूट फॉर सोशल अण्ड इकॉनॉमिकल चेंज यांच्या मते भारतातील अंदाजे दोन टक्के महिलांमध्ये २८ ते ३४ या वयोगटामध्ये रजोनिवृत्ती होताना दिसते, तर ३५ ते ३९ या वयोगटामध्ये हे प्रमाण ८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
स्त्रीबीजकोष निकामी झाला की त्यातील इस्ट्रोजन हार्मोन्सचे प्रमाण कमी होते. किंवा त्यात इस्ट्रोजनची निर्मिती केली जात नाही. बीजनिर्मिती न झाल्यामुळे फलनाच्या प्रक्रियेस अडसर निर्माण होतो. स्त्रियांमधील पुनरुत्पादनाची क्षमता कमी होते व त्यांना गर्भधारणा होणे कठीण होते. रजोनिवृत्तीच्या काळात जी लक्षणे दिसतात, तीच लक्षणे या महिलांमध्ये दिसून येतात, याकडे डॉ. सुलभा अरोरा यांनी मुंबईत झालेल्या चर्चासत्रामध्ये लक्ष वेधले.
पीओएफसाठी कोणतेही ठोस वैद्यकीय उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे इस्ट्रोजन पातळीमध्ये घट होत असल्याने संप्रेरकांमधील बदलांवर उपचार करता येतात. मात्र स्त्रीबीजकोषाची अकार्यक्षमता दुरुस्त करता येत नाही. गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर सल्ला न घेता मनमानीपणे केला तर त्याचे दुष्परिणाम होतात. गर्भाशयाची शस्त्रक्रिया, कर्करोगावर मात करण्यासाठी घेण्यात येणारी थेरपी वा काही प्रमाणात अनुवांशिकतेमुळेही स्त्रीबीजकोष लवकर अकार्यक्षम होतात. पर्यावरणातील आरोग्यासाठी हानीकारक घटकांच्या संसर्गामुळेही लवकर रजोनिवृत्ती येण्याचा त्रास संभवतो.
लक्षणे
तारुण्यामध्येच मासिक पाळी जाण्याची लक्षणे जाणवतात. मासिक पाळी अनियमित होते. रजोनिवृत्तीमध्ये ज्या प्रकारे लक्षणे दिसतात तशीच लक्षणे दिसू लागतात. झोप लागत नाही, घाम येतो, रात्रीअपरात्री दचकून जाग येते. स्वभाव चिडचिडा होतो. मूत्राशयावर नियंत्रण राहत नाही. एन्डोमेट्रॉसिससारख्या वैद्यकीय समस्येमध्येही स्त्रीबीजकोष अकार्यक्षम होण्याची शक्यता असते.