अ‍ॅपशहर

'भारत, चीन एकमेकांना पराभूत करू शकत नाही'

'भारत आणि चीन एकमेकांना पराभूत करू शकत नाही. दोन्ही देशांनी चांगले शेजारी म्हणून राहिले पाहिजे. त्यांच्यासमोर 'हिंदी-चिनी भाई-भाई'ची भावना पुढे नेण्याचा एकमेव मार्ग आहे', असं बौद्ध धर्मगुरू दलाई लामा म्हणाले.

Maharashtra Times 14 Aug 2017, 7:21 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india china cannot defeat each other says dalai lama
'भारत, चीन एकमेकांना पराभूत करू शकत नाही'


'भारत आणि चीन एकमेकांना पराभूत करू शकत नाही. दोन्ही देशांनी चांगले शेजारी म्हणून राहिले पाहिजे. त्यांच्यासमोर 'हिंदी-चिनी भाई-भाई'ची भावना पुढे नेण्याचा एकमेव मार्ग आहे', असं बौद्ध धर्मगुरू दलाई लामा म्हणाले.

'सीमेवरील विद्यमान स्थितीत ना चीन भारताला पराभूत करू शकत ना भारत चीनला. दोन्ही देशांकडे मोठी सैन्य शक्ती आहे', असं दलाई लामा म्हणाले. मुंबईतील एका कार्यक्रमात पत्रकारांनी लामा यांना डोकलाममधील भारत, चीन तणावावर प्रश्न विचारले. त्यावर लामा यांनी उत्तर दिलं.

'चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार आहे. पण तरीही मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा स्वीकार चीनमध्ये झाला आहे. १९५१ मध्ये तिबेट सरकार आणि चीनमध्ये तिबेटच्या स्वातंत्र्यावर १७ सूत्री सामंजस्य करार झाला होता. आज चीन बदलत आहे. सध्या चीनमध्ये सर्वाधिक लोकसंख्या बौद्ध धर्मीयांची आहे. यामुळे दोन्ही देशांनी 'हिंदी-चिनी भाई-भाई'वर भर दिला पाहिजे', असं मत लामा यांनी व्यक्त केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज