अ‍ॅपशहर

भारतीय मालिकांच्या परदेशी रिमेकची प्रतीक्षाच

एकही भारतीय मालिका परदेशात दाखवली गेलेली नाही.

Maharashtra Times 27 Oct 2016, 4:03 am
Rutuja.joshi@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indian serials
भारतीय मालिकांच्या परदेशी रिमेकची प्रतीक्षाच


Twitter : @RutujaJoshiMT

मुंबई ः परदेशी मालिकांचे भारतीय व्हर्जन परवानगी घेऊन छोट्या पडद्यावर दाखवण्याची पद्धत आपल्याकडे तशी जुनीच. मात्र अद्याप एकही भारतीय मालिका अशा पद्धतीने परदेशात दाखवली गेलेली नाही. यामागची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, आपल्याकडे वर्षानुवर्षे चालणाऱ्या मालिकांची लांबी हा त्यातील मोठा अडथळा असल्याचे समोर आले.

गेल्या वर्षी छोट्या पडद्यावर आलेली ‘सुमित संभाल लेगा’ असो किंवा लवकरच सुरू होणारी ‘बंदी युद्ध के’, परदेशी मालिकांचे भारतीय रिमेक गेली काही वर्षे छोट्या पडद्यावर होताना दिसताहेत. परदेशातल्या मालिका कमी लांबीच्या आणि मर्यादित एपिसोड्सच्या असतात. भारतात मात्र वर्षानुवर्षे मालिका सुरू ठेवण्याची परंपरा आहे. याच कारणामुळे अद्याप भारतीय मालिका परदेशात पोहोचू शकल्या नसल्याचे ‘स्टार इंडिया’च्या गौरव बॅनर्जी यांनी सांगितले. मुंबई फिल्म फेस्टिवलमध्ये यंदा पहिल्यांदाच टीव्हीसाठी एक स्वतंत्र सेक्शन सुरू करण्यात आले. ‘बंदी युद्ध के’ या स्टार प्लसच्या मालिकेच्या स्क्रिनिंगने त्याची सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या गप्पांमध्ये बॅनर्जी यांनी या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली.

‘भारतीय मालिका फॅमिली, संस्कृती याच्या बाहेर जात नाहीत. त्याउलट परदेशात मालिकांमध्येही अनेक प्रयोग केले जातात. त्यामुळे भारतीय मालिकाच काय, पण बॉलिवूडच्या सिनेमांचेही आजवर फारसे रिमेक झालेले नाहीत,’ असे ते म्हणाले.

भारतात टीव्ही हे माध्यम नवे आहे. अवघ्या सोळा- सतरा वर्षांत आपण अनेक चांगले बदल घडवले. पण परदेशात मात्र भारतीय मालिकांचे रिमेक बनत नाही. आपण हजार भागांचे टप्पे गाठत असतो. हा मोठा अडथळा आहे. परदेशी टीव्ही क्षेत्राला आपली दखल घ्यायला लावण्यासाठी अजून थोडा वेळ द्यावा लागेल.

- गौरव बॅनर्जी, स्टार इंडिया कन्टेन्ट स्टुडिओ हेड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज