म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी विवाह केल्याने मुलाच्या कुटुंबाला मुलीच्या कुटुंबीयांकडून जिवे मारण्याची धमकी दिली जात असतानाही पोलिसांनी या जोडप्याला व त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 'दोन दिवसांत निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुंबई उच्च न्यायालयात २९ ऑक्टोबरला दिली असतानाही पोलिसांनी ५ नोव्हेंबरपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही', असा आरोप या जोडप्याचे अॅड. आनंद जोंधळे यांनी केला असून, याप्रश्नी पोलिसांविरोधात लवकरच न्यायालय अवमानाची याचिका करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'उजमा मुराद हिने दशरथ कदम याच्यावर प्रेम असल्याने त्याच्याशी गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरला विवाह केला होता. उजमाने धर्म परिवर्तन करून दर्शना असे नावही धारण केले होते. मात्र, विवाहानंतर उजमाच्या कुटुंबाने दशरथला व त्याच्या कुटुंबाला धमकावण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर काही वेळा मारहाणही केली', असा गंभीर आरोप करत उच्च न्यायालयात अॅड. आनंद जोंधळे यांच्यामार्फत फौजदारी रिट याचिका करण्यात आली होती. त्याविषयी न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर २९ ऑक्टोबरला सुनावणी झाली असता, पोलिस संरक्षण देण्यासंदर्भात याचिकादारांनी अर्ज दिला तर खरोखरच त्यांच्या जिवाला धोका आहे का, याची खातरजमा करून योग्य तो निर्णय कोणत्याही परिस्थितीत दोन दिवसांच्या आत घेऊ', अशी ग्वाही मुंबई पोलिसांच्या संरक्षण विभागातर्फे सहायक सरकारी वकील के. व्ही. सस्ते यांनी दिली होती. त्याप्रमाणे खंडपीठाने ती नोंदीवर घेऊन याचिका निकाली काढली होती. मात्र, 'न्यायालयाच्या आदेशाची प्रत त्याचदिवशी मिळाल्यानंतर हे जोडपे पोलिस कार्यालयात गेले असता, त्यांना निव्वळ बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा दोन दिवस अर्ज देण्यासाठी गेले असता त्यांना पुन्हा तशीच वागणूक देण्यात आली. त्यांना पोलिस आयुक्तांचीही भेट मिळू शकली नाही. त्यामुळे आजतागायत त्यांना पोलिस संरक्षण मिळालेले नाही', असा आरोप अॅड. जोंधळे यांनी केला आहे. तसेच याप्रश्नी सुटीकालीन न्यायालयात लवकरच अवमान याचिका करणार असल्याचेही त्यांनी 'म.टा.'ला सांगितले.
मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी विवाह केल्याने मुलाच्या कुटुंबाला मुलीच्या कुटुंबीयांकडून जिवे मारण्याची धमकी दिली जात असतानाही पोलिसांनी या जोडप्याला व त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 'दोन दिवसांत निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुंबई उच्च न्यायालयात २९ ऑक्टोबरला दिली असतानाही पोलिसांनी ५ नोव्हेंबरपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही', असा आरोप या जोडप्याचे अॅड. आनंद जोंधळे यांनी केला असून, याप्रश्नी पोलिसांविरोधात लवकरच न्यायालय अवमानाची याचिका करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'उजमा मुराद हिने दशरथ कदम याच्यावर प्रेम असल्याने त्याच्याशी गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरला विवाह केला होता. उजमाने धर्म परिवर्तन करून दर्शना असे नावही धारण केले होते. मात्र, विवाहानंतर उजमाच्या कुटुंबाने दशरथला व त्याच्या कुटुंबाला धमकावण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर काही वेळा मारहाणही केली', असा गंभीर आरोप करत उच्च न्यायालयात अॅड. आनंद जोंधळे यांच्यामार्फत फौजदारी रिट याचिका करण्यात आली होती. त्याविषयी न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर २९ ऑक्टोबरला सुनावणी झाली असता, पोलिस संरक्षण देण्यासंदर्भात याचिकादारांनी अर्ज दिला तर खरोखरच त्यांच्या जिवाला धोका आहे का, याची खातरजमा करून योग्य तो निर्णय कोणत्याही परिस्थितीत दोन दिवसांच्या आत घेऊ', अशी ग्वाही मुंबई पोलिसांच्या संरक्षण विभागातर्फे सहायक सरकारी वकील के. व्ही. सस्ते यांनी दिली होती. त्याप्रमाणे खंडपीठाने ती नोंदीवर घेऊन याचिका निकाली काढली होती. मात्र, 'न्यायालयाच्या आदेशाची प्रत त्याचदिवशी मिळाल्यानंतर हे जोडपे पोलिस कार्यालयात गेले असता, त्यांना निव्वळ बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा दोन दिवस अर्ज देण्यासाठी गेले असता त्यांना पुन्हा तशीच वागणूक देण्यात आली. त्यांना पोलिस आयुक्तांचीही भेट मिळू शकली नाही. त्यामुळे आजतागायत त्यांना पोलिस संरक्षण मिळालेले नाही', असा आरोप अॅड. जोंधळे यांनी केला आहे. तसेच याप्रश्नी सुटीकालीन न्यायालयात लवकरच अवमान याचिका करणार असल्याचेही त्यांनी 'म.टा.'ला सांगितले.