अ‍ॅपशहर

'समानता हीच इस्लामची शिकवण'

मुस्लिम धर्मामध्ये कुठेही स्त्री- पुरुष असा भेदभाव केलेला नाही, मात्र मूल्यांचा ह्रास होत असताना धर्मतत्त्वाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने सांगितला जात आहे. स्त्री-पुरुष दोघेही समान आहेत, त्यांचे घटनात्मक हक्कही अबाधित राहायला हवेत, हीच इस्लामची शिकवण हाजी अलीसंदर्भातील निर्णयाने अधोरेखित केली आहे, असे स्पष्ट मत याचिकाकर्त्या डॉ. नूरजहां साफिया नियाज यांनी व्यक्त केले.

Maharashtra Times 27 Aug 2016, 12:32 am
Sharmila.kalgutkar@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम islams teachings
'समानता हीच इस्लामची शिकवण'


मुंबई : मुस्लिम धर्मामध्ये कुठेही स्त्री- पुरुष असा भेदभाव केलेला नाही, मात्र मूल्यांचा ह्रास होत असताना धर्मतत्त्वाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने सांगितला जात आहे. स्त्री-पुरुष दोघेही समान आहेत, त्यांचे घटनात्मक हक्कही अबाधित राहायला हवेत, हीच इस्लामची शिकवण हाजी अलीसंदर्भातील निर्णयाने अधोरेखित केली आहे, असे स्पष्ट मत याचिकाकर्त्या डॉ. नूरजहां साफिया नियाज यांनी व्यक्त केले.

मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या वरळी येथील हाजी अली दर्ग्यातील मझारच्या परिसरात महिलांना प्रवेश बंदी होती, त्याविरोधात डॉ. नूरजहां यांनी भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या वतीने याचिका दाखल केली होती. हा लढा केवळ मुस्लिम महिलांचा नाही तर ज्या ज्या ठिकाणी, ज्या धर्मामध्ये, जातींमध्ये, समूहामध्ये महिलांचे वेगवेगळ्या कारणांनी शोषण होते, त्यांच्यावर निर्बंध लादले जातात त्या प्रत्येकीसाठी दिलेला लढा आहे, असे मत डॉ. नूरजहां यांनी व्यक्त ‘मटा’शी बोलताना व्यक्त केले.

इतिहासातील घटनाक्रम पाहिला तर स्त्रीने व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तिचा आवाज दाबून टाकण्यात आला आहे. वर्तमानामध्येही तेच दाखले दिसतात. प्रश्न हिंदू मंदिरांचा असो वा हाजी अलीचा, कोणताही धर्म असमानतेची शिकवण देत नाही, मात्र त्याचे पद्धतशीर राजकारण केले जाते. ते बाईच्या विरोधात असते, तिच्या घटनात्मक हक्कांची पायमल्ली करणारे असते. हाजी अली दर्ग्यांमध्ये मझारपर्यंत महिलांनाही प्रवेश मिळायलाच हवा, हा निर्णय महिलांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादण्याचा, बंधने घालण्याचा अधिकार कुणालाही नाही, हेच ध्वनित करतो, असेही नूरजहां यांनी स्पष्ट केले.

तीन वर्षांपासून भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या वतीने महिलांना मझारपर्यंत प्रवेश मिळावा, यासाठी हे आंदोलन मुंबईतून सुरू झाले. भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाला पुढच्या टप्प्यांत राज्यातून वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतील सर्वसामान्य मुस्लिम तसेच बिगरमुस्लिम स्त्रियांचाही पाठिंबा मिळाला. धर्मात मझारमध्ये प्रवेश नाही, असे बिंबवल्याने प्रवेश स्वतःच्या घटनात्मक हक्कांपासून दूर राहिलेल्या महिलांनाही आता या निर्णयामुळे आत्मभान मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

विरोध तर होणारच!

हाजी अली दर्गा ट्रस्टसह काही राजकीय पक्षही या निर्णयाला विरोध करणार हे अपेक्षितच आहे. लोकशाहीमध्ये विरोधाचा आवाजही असतो. मात्र, तो विरोध नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर आहे हे पटवून देता यायला हवे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज