मुंबई:
महापालिका सभागृह, स्थायी समिती व अन्य वैधानिक समित्यांमध्ये नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या हरकतीच्या मुद्यावर 'सत्य असले तरी, तथ्य नाही' असा अध्यक्षांच्यावतीने दिला जाणारा निर्णय आता इतिहासजमा होणार आहे. अशा प्रकारच्या वक्तव्याने महत्वाच्या विषयाचे गांभीर्य कमी होते. त्यामुळे हे वाक्य पालिकेच्या पटलावरून काढून टाकण्याचा निर्णय प्रभाग समितीतर्फे घेण्यात आला आहे.
मुंबईतील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवकांना हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याचा अधिकार आहे. तसेच चर्चेच्यावेळी आपल्याला जे पटत नाही, त्यावर हरकत घेता येते. हरकतीच्या मुद्यांवर जोरदार चर्चाही रंगते. त्यावर उत्तर देताना संबंधित समित्यांचे अध्यक्ष 'सत्य असले तरी, तथ्य नाही', असा निर्णय देतात. त्यामुळे पोटतिडकीने बोलणाऱ्या नगरसेवकांची निराशा होते. शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी याबाबत अंधेरी के-पश्चिम प्रभाग समितीत आक्षेप घेतला. हरकतीच्या मुद्यात सत्य असले तरी, तथ्य नाही असा निर्णय देणे ही शोकांतिका आहे. असा निर्णय देणे पालिकेच्या अधिनियमांना धरून नाही. त्यामुळे हे वाक्य काढण्यात यावे, अशी मागणी पेडणेकर यांनी यंदाच्या एप्रिलमध्ये केली होती.
प्रभाग समिती अध्यक्षांनी चिटणीस विभागाच्या संमतीने याप्रकरणी अभिप्राय देताना, पालिका नियम १९ अन्वये अध्यक्षाने हरकतीच्या व कार्यपध्दतीसंबंधी सर्व मुद्यावर तात्काळ निर्णय दिला पाहिजे असे नमूद आहे. त्यामुळे यापुढे प्रभाग समिती सदस्यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्यास तो ग्राह्य, अग्राह्य अथवा राखून ठेवण्यात येत आहे, असा निर्णय देण्यात येईल, असे स्पष्ट करत सत्य, तथ्यचा उल्लेख निकाली काढण्यात आला आहे.
महापालिका सभागृह, स्थायी समिती व अन्य वैधानिक समित्यांमध्ये नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या हरकतीच्या मुद्यावर 'सत्य असले तरी, तथ्य नाही' असा अध्यक्षांच्यावतीने दिला जाणारा निर्णय आता इतिहासजमा होणार आहे. अशा प्रकारच्या वक्तव्याने महत्वाच्या विषयाचे गांभीर्य कमी होते. त्यामुळे हे वाक्य पालिकेच्या पटलावरून काढून टाकण्याचा निर्णय प्रभाग समितीतर्फे घेण्यात आला आहे.
मुंबईतील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवकांना हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याचा अधिकार आहे. तसेच चर्चेच्यावेळी आपल्याला जे पटत नाही, त्यावर हरकत घेता येते. हरकतीच्या मुद्यांवर जोरदार चर्चाही रंगते. त्यावर उत्तर देताना संबंधित समित्यांचे अध्यक्ष 'सत्य असले तरी, तथ्य नाही', असा निर्णय देतात. त्यामुळे पोटतिडकीने बोलणाऱ्या नगरसेवकांची निराशा होते. शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी याबाबत अंधेरी के-पश्चिम प्रभाग समितीत आक्षेप घेतला. हरकतीच्या मुद्यात सत्य असले तरी, तथ्य नाही असा निर्णय देणे ही शोकांतिका आहे. असा निर्णय देणे पालिकेच्या अधिनियमांना धरून नाही. त्यामुळे हे वाक्य काढण्यात यावे, अशी मागणी पेडणेकर यांनी यंदाच्या एप्रिलमध्ये केली होती.
प्रभाग समिती अध्यक्षांनी चिटणीस विभागाच्या संमतीने याप्रकरणी अभिप्राय देताना, पालिका नियम १९ अन्वये अध्यक्षाने हरकतीच्या व कार्यपध्दतीसंबंधी सर्व मुद्यावर तात्काळ निर्णय दिला पाहिजे असे नमूद आहे. त्यामुळे यापुढे प्रभाग समिती सदस्यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्यास तो ग्राह्य, अग्राह्य अथवा राखून ठेवण्यात येत आहे, असा निर्णय देण्यात येईल, असे स्पष्ट करत सत्य, तथ्यचा उल्लेख निकाली काढण्यात आला आहे.