म. टा. प्रतिनिधी, मुंबई
जनधन योजनेतील बँक खात्यामुळे सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात वांद्रे पोलिसांना यश आले आहे. वांद्रे येथील नामांकित कंपनीत झालेल्या ९ लाखांच्या चोरीतील आरोपीची ओळख पटत नव्हती. मात्र आरोपीने जनधन योजनेतून उघडलेल्या खात्याच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाने या आरोपीला ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी सांगितले.
मूळचा बिहारचा राहणारा रमणकुमार मिश्रा (४६) हा वर्षभरापूर्वी मुंबईत आला होता. विलेपार्ले येथे तो काही मुलांसह रहात होता. ओळखीने वांद्रे येथील रिलायन्स कंपनीत सुरक्षा रक्षकांची नोकरी मिळाली. त्याचवेळी पगाराची बचत करण्यासाठी मित्रांच्या मदतीने जनधन योजनेद्वारे बँकेत खाते उघडले. दरम्यान, कंपनीतील कोट्यवधी रुपयांची उलाढाल पाहून रमणने डिसेंबर २०१५ मध्ये कंपनीत चोरी करण्याचा कट रचला. चोरीसाठी तिजोरीची चावी देखील चोरली. मात्र काही दिवसांतच त्याची बदली कांदिवली येथे झाली. चोरी केल्यानंतर कुणाला संशय किंवा स्वतःबाबत माहिती मागे न सोडण्याची काळजीही त्यानं घेतली होती.
१८ जुलै २०१६ला तो चोरी करण्यासाठी कार्यालयात शिरला. कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून ओळख लपवण्यासाठी त्यानं कॅमेऱ्याच्या समोर छत्री धरली आणि ९ लाख १५ हजार रुपये चोरून गावाला पळ काढला. चोरीच्या घटनेनंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक धनंजय साठे, पोलीस हवालदार देवेंद्र पांगे यांनी कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी केली. मात्र कॅमेऱ्यापुढे येणाऱ्या छत्रीमुळे आरोपीची ओळख पटत नव्हती. अशातच चोरीच्या घटनेनंतर राजीनामा देऊन गावी गेलेल्या रमणवर पोलिसांचा संशय बळावला. रमणबाबत कंपनीकडे आणि त्याच्यासोबतच्या मित्रांकडे कोणतीही माहिती नव्हती. अशातच त्याने जनधन योजनेद्वारे बँकेत खाते उघडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बँकेत चौकशी केल्यानंतर रमणचा मोबाइल, गावचा पत्ता मिळाला. त्यावर पोलिसांनी चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमीष दाखवून त्याला बोलावून घेतले. तो मुंबईत परतताच पोलिसांनी बुधवारी त्याला विलेपार्ले येथून अटक केली. त्याच्याकडून सात लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
जनधन योजनेतील बँक खात्यामुळे सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात वांद्रे पोलिसांना यश आले आहे. वांद्रे येथील नामांकित कंपनीत झालेल्या ९ लाखांच्या चोरीतील आरोपीची ओळख पटत नव्हती. मात्र आरोपीने जनधन योजनेतून उघडलेल्या खात्याच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाने या आरोपीला ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी सांगितले.
मूळचा बिहारचा राहणारा रमणकुमार मिश्रा (४६) हा वर्षभरापूर्वी मुंबईत आला होता. विलेपार्ले येथे तो काही मुलांसह रहात होता. ओळखीने वांद्रे येथील रिलायन्स कंपनीत सुरक्षा रक्षकांची नोकरी मिळाली. त्याचवेळी पगाराची बचत करण्यासाठी मित्रांच्या मदतीने जनधन योजनेद्वारे बँकेत खाते उघडले. दरम्यान, कंपनीतील कोट्यवधी रुपयांची उलाढाल पाहून रमणने डिसेंबर २०१५ मध्ये कंपनीत चोरी करण्याचा कट रचला. चोरीसाठी तिजोरीची चावी देखील चोरली. मात्र काही दिवसांतच त्याची बदली कांदिवली येथे झाली. चोरी केल्यानंतर कुणाला संशय किंवा स्वतःबाबत माहिती मागे न सोडण्याची काळजीही त्यानं घेतली होती.
१८ जुलै २०१६ला तो चोरी करण्यासाठी कार्यालयात शिरला. कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून ओळख लपवण्यासाठी त्यानं कॅमेऱ्याच्या समोर छत्री धरली आणि ९ लाख १५ हजार रुपये चोरून गावाला पळ काढला. चोरीच्या घटनेनंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक धनंजय साठे, पोलीस हवालदार देवेंद्र पांगे यांनी कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी केली. मात्र कॅमेऱ्यापुढे येणाऱ्या छत्रीमुळे आरोपीची ओळख पटत नव्हती. अशातच चोरीच्या घटनेनंतर राजीनामा देऊन गावी गेलेल्या रमणवर पोलिसांचा संशय बळावला. रमणबाबत कंपनीकडे आणि त्याच्यासोबतच्या मित्रांकडे कोणतीही माहिती नव्हती. अशातच त्याने जनधन योजनेद्वारे बँकेत खाते उघडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बँकेत चौकशी केल्यानंतर रमणचा मोबाइल, गावचा पत्ता मिळाला. त्यावर पोलिसांनी चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमीष दाखवून त्याला बोलावून घेतले. तो मुंबईत परतताच पोलिसांनी बुधवारी त्याला विलेपार्ले येथून अटक केली. त्याच्याकडून सात लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.