म. टा. प्रतिनिधी, मुंबई
‘राज्यातील वेगवेगळ्या भागात पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याचे वृत्त वाचून मला दुःख होते. पत्रकारांच्या संरक्षणार्थ कायद्याचे भक्कम कवच हवे. त्यादृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री गांभीर्याने प्रयत्न करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे,’ असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी राजभवन येथे अरविंद बाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार प्रदान करताना केले.
अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता विभागीय पुरस्कारांनी महाराष्ट्र टाइम्सच्या शर्मिला कलगुटकर यांच्याबरोबरच प्रशांत जोशी, जयसिंग कुंभार, दीप्ती राऊत, सोमनाथ सावळे, गजानन जानभोर, प्रमोद कुलकर्णी यांना तर संतोष आंधळे, संजय देशमुख यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वाढती असहिष्णुता या विषयावर देशात सर्वत्र चिंतन सुरू आहे. मात्र, सहिष्णुता भारतीयांच्या नसानसात भिनली असून कुणीही लोकांवर असहिष्णुता लादू शकत नाही, असे स्पष्ट करत प्रसारमाध्यमांनी केवळ भावनात्मक विषयांना जागा न देता जनसामान्यांच्या, उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, असे आवाहन विद्यासागर राव यांनी याप्रसंगी केले.
पुरस्कारामुळे पत्रकारांची जबाबदारी वाढली असून, पुरस्कारप्राप्त पत्रकारांनी विविध घटकांना यापुढे अधिक जोमाने न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पत्रकारांनी कुठल्याही स्थितीत विश्वसनीयता व बांधिलकी जपली पाहिजे, असे ज्येठ पत्रकार एम. जे. अकबर यांनी सांगितले. कार्यक्रमास फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी मंत्री रणजीत देशमुख, कार्याध्यक्ष आशीष देशमुख उपस्थित होते.
‘राज्यातील वेगवेगळ्या भागात पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याचे वृत्त वाचून मला दुःख होते. पत्रकारांच्या संरक्षणार्थ कायद्याचे भक्कम कवच हवे. त्यादृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री गांभीर्याने प्रयत्न करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे,’ असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी राजभवन येथे अरविंद बाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार प्रदान करताना केले.
अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता विभागीय पुरस्कारांनी महाराष्ट्र टाइम्सच्या शर्मिला कलगुटकर यांच्याबरोबरच प्रशांत जोशी, जयसिंग कुंभार, दीप्ती राऊत, सोमनाथ सावळे, गजानन जानभोर, प्रमोद कुलकर्णी यांना तर संतोष आंधळे, संजय देशमुख यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वाढती असहिष्णुता या विषयावर देशात सर्वत्र चिंतन सुरू आहे. मात्र, सहिष्णुता भारतीयांच्या नसानसात भिनली असून कुणीही लोकांवर असहिष्णुता लादू शकत नाही, असे स्पष्ट करत प्रसारमाध्यमांनी केवळ भावनात्मक विषयांना जागा न देता जनसामान्यांच्या, उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, असे आवाहन विद्यासागर राव यांनी याप्रसंगी केले.
पुरस्कारामुळे पत्रकारांची जबाबदारी वाढली असून, पुरस्कारप्राप्त पत्रकारांनी विविध घटकांना यापुढे अधिक जोमाने न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पत्रकारांनी कुठल्याही स्थितीत विश्वसनीयता व बांधिलकी जपली पाहिजे, असे ज्येठ पत्रकार एम. जे. अकबर यांनी सांगितले. कार्यक्रमास फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी मंत्री रणजीत देशमुख, कार्याध्यक्ष आशीष देशमुख उपस्थित होते.