मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या मुंबईतील किनन-रुबेन हत्या प्रकरणातील चार दोषींना आज विशेष कोर्टानं आजीवन कारावासाची सुनावली आहे. जितेंद्र राणा, सुनील बोध, सतीश दुल्हज आणि दीपक तिवल अशी त्यांची नावं आहेत.
पाच वर्षांपूर्वी, २०११ मध्ये किनन (२४) आणि रुबेन (२९) अंधेरीतील आंबोली परिसरातील हॉटेलमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत जेवायला गेले होते. त्यावेळी काही टपोरींनी मुलींची छेड काढण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून किनन-रुबेन चिडले. त्यांनी या तरुणांना रोखलं. त्यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर ते तरुण निघून गेले. पण थोड्याच वेळात आपल्या साथीदारांना घेऊन आले. त्यांनी किनन आणि रुबेनची चाकून हत्या केली होती. या भीषण घटनेचे पडसाद देशपातळीवर उमटले होते. मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला होता.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी जितेंद्र राणा, सुनील बोध, सतीश दुल्हज आणि दीपक तिवल यांना छेडछाड, हत्या, कट या आरोपांखाली अटक केली होती. या खटल्याची सुनावणी विशेष कोर्टात झाली आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्यात अभियोग पक्षाची बाजू मांडली. पाच प्रत्यक्षदर्शींसह २८ जणांनी या प्रकरणी कोर्टात साक्ष दिली होती. त्या आधारे आज विशेष न्यायाधीश वृषाली जोशी यांनी आज निकाल दिला.
आमच्या मुलांची हत्या करणाऱ्या दोषींना मरेपर्यंत जन्मठेप द्यावी, ही किनन-रुबेनच्या पालकांची भावना लक्षात घेऊन विशेष कोर्टानं अटक केलेल्या चारही जणांना दोषी ठरवून आजीवन तुरुंगवास ठोठावला आहे.
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या मुंबईतील किनन-रुबेन हत्या प्रकरणातील चार दोषींना आज विशेष कोर्टानं आजीवन कारावासाची सुनावली आहे. जितेंद्र राणा, सुनील बोध, सतीश दुल्हज आणि दीपक तिवल अशी त्यांची नावं आहेत.
पाच वर्षांपूर्वी, २०११ मध्ये किनन (२४) आणि रुबेन (२९) अंधेरीतील आंबोली परिसरातील हॉटेलमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत जेवायला गेले होते. त्यावेळी काही टपोरींनी मुलींची छेड काढण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून किनन-रुबेन चिडले. त्यांनी या तरुणांना रोखलं. त्यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर ते तरुण निघून गेले. पण थोड्याच वेळात आपल्या साथीदारांना घेऊन आले. त्यांनी किनन आणि रुबेनची चाकून हत्या केली होती. या भीषण घटनेचे पडसाद देशपातळीवर उमटले होते. मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला होता.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी जितेंद्र राणा, सुनील बोध, सतीश दुल्हज आणि दीपक तिवल यांना छेडछाड, हत्या, कट या आरोपांखाली अटक केली होती. या खटल्याची सुनावणी विशेष कोर्टात झाली आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्यात अभियोग पक्षाची बाजू मांडली. पाच प्रत्यक्षदर्शींसह २८ जणांनी या प्रकरणी कोर्टात साक्ष दिली होती. त्या आधारे आज विशेष न्यायाधीश वृषाली जोशी यांनी आज निकाल दिला.
आमच्या मुलांची हत्या करणाऱ्या दोषींना मरेपर्यंत जन्मठेप द्यावी, ही किनन-रुबेनच्या पालकांची भावना लक्षात घेऊन विशेष कोर्टानं अटक केलेल्या चारही जणांना दोषी ठरवून आजीवन तुरुंगवास ठोठावला आहे.