महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी रात्री सायन येथील सोमय्या मैदानात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. या सरकारकडून काहीही होणार नाही. मला एकदा सत्ता द्या, मी तुमच्या मागण्या कशा पूर्ण करतो ते बघा, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी आधी काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता दिली. त्यानंतर भाजपला दिली. तरीही शब्द पाळला जात नाही. तुमची किंमत ही फक्त मतापुरती आहे, तुम्हाला सगळ्यांनी फक्त गृहीत धरलेले आहे, असेही ते म्हणाले. मी तुमच्यासाठी शक्य ते करेन, पक्ष म्हणून कायम तुमच्या पाठीशी उभा आहे असे आश्वासनही त्यांनी दिले. सरकारविरोधातील हा राग निवडणुकीच्या वेळीही कायम ठेवा. मोर्चात चालताना पायातून आलेले रक्त विसरू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
'सरकारविरोधातील राग कायम ठेवा': राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी रात्री सायन येथील सोमय्या मैदानात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. या सरकारकडून काहीही होणार नाही. मला एकदा सत्ता द्या, मी तुमच्या मागण्या कशा पूर्ण करतो ते बघा, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी आधी काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता दिली.
Maharashtra Times 12 Mar 2018, 4:38 am