म. टा. प्रतिनिधी, मुंबई
स्वच्छतेचा मूलमंत्र वारकऱ्यांमार्फत गावोगावी पोहचवण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेसह राज्य सरकारने संयुक्तपणे मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छतेचा विचार राज्यात घेऊन जाणाऱ्या कीर्तनकारांची परिषद मंगळवार, ११ डिसेंबर रोजी विधानभवनात सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे.
स्वच्छ भारताचा संदेश कीर्तनकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यांच्या प्रत्येक कुटुंबात रुजवण्याची मोहीम आखण्यात आली आहे. प्रत्येकाच्या मनात स्वच्छतेचा विचार रुजवण्यासाठी मोहीम उपयुक्त ठरेल, असा विश्वास 'वारकरी साहित्य परिषदे'चे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी व्यक्त केला आहे. या मोहिमेचा भाग म्हणून वारकरी साहित्य परिषदेचे कीर्तनकार स्वच्छतेचा संदेश घेऊन राज्यातील ४० हजार गावांत जाणार आहेत. त्या गावांतील सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, गावकरी, स्थानिक वारकऱ्यांसोबत गावात टाळमृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात येईल. दिंडीनंतर कीर्तनकार स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल निरूपण करतील. स्वच्छतेचा संदेश गावागावात पोहोचल्यास त्यातून आरोग्याच्या समस्या कमी होतील, हा हेतू बाळगण्यात आला आहे. त्याबरोबर, सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून स्वछतेबाबत आश्वासनपत्र भरून घेतले जाईल.
या परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे, बापूसाहेब महाराज देहूकर आदी उपस्थित राहणार आहेत.
स्वच्छतेचा मूलमंत्र वारकऱ्यांमार्फत गावोगावी पोहचवण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेसह राज्य सरकारने संयुक्तपणे मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छतेचा विचार राज्यात घेऊन जाणाऱ्या कीर्तनकारांची परिषद मंगळवार, ११ डिसेंबर रोजी विधानभवनात सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे.
स्वच्छ भारताचा संदेश कीर्तनकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यांच्या प्रत्येक कुटुंबात रुजवण्याची मोहीम आखण्यात आली आहे. प्रत्येकाच्या मनात स्वच्छतेचा विचार रुजवण्यासाठी मोहीम उपयुक्त ठरेल, असा विश्वास 'वारकरी साहित्य परिषदे'चे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी व्यक्त केला आहे. या मोहिमेचा भाग म्हणून वारकरी साहित्य परिषदेचे कीर्तनकार स्वच्छतेचा संदेश घेऊन राज्यातील ४० हजार गावांत जाणार आहेत. त्या गावांतील सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, गावकरी, स्थानिक वारकऱ्यांसोबत गावात टाळमृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात येईल. दिंडीनंतर कीर्तनकार स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल निरूपण करतील. स्वच्छतेचा संदेश गावागावात पोहोचल्यास त्यातून आरोग्याच्या समस्या कमी होतील, हा हेतू बाळगण्यात आला आहे. त्याबरोबर, सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून स्वछतेबाबत आश्वासनपत्र भरून घेतले जाईल.
या परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे, बापूसाहेब महाराज देहूकर आदी उपस्थित राहणार आहेत.