मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
'मुंबई प्रेस क्लब' या संस्थेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अध्यक्षपदी विजय मिळवला आहे. केतकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ज्येष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी यांचा १२२ मतांनी पराभव केला. केतकर यांना ४४५ तर त्रिपाठी यांना ३२३ मतं मिळाली.
संस्थेच्या चेअरमनपदी राजेश मस्करेन्हास ४९० मते मिळवून विजयी झाले. त्यांनी विनोद जगदाळे (२८७ मते) यांचा पराभव केला. व्हाइस चेअरमन म्हणून क्रीडा पत्रकार अयाझ मेमन हे निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सय्यद वासीम हैदर यांना ३०५ मते मिळाली. सचिवपदी धर्मेंद्र जोरे यांनी ४७७ मते मिळवून प्रसाद काथे (२८८ मते) यांचा १८९ मतांनी पराभव केला. संयुक्त सचिवपदी रजनीश काकडे यांची निवड झाली. काकडे यांना ४६६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नंदकिशोर भारतीय यांच्या पारड्यात २९४ मते पडली. खजिनदारपदी ओम प्रकाश तिवारी विजयी झाले. त्यांना ४२९ तर प्रतिस्पर्धी उमेदवार वरुण सिंह यांना ३२१ मते मिळाली.
प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रेटिक अलायन्स (पीडीए) आणि युनायटेड अलायन्स फॉर इक्वॅलिटी (यूएइ) अशा दोन पॅनलमध्ये मुख्य लढत झाली. त्यात पीडीएने सर्व जागा जिंकत निर्भेळ यश मिळवले.
व्यवस्थापन समितीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे...
- संतोष आंधळे - ४८० मते - मृत्युंजय बोस - ४७० मते - लता मिश्रा - ४४१ मते - अशिष राजे - ४२१ मते - प्रकाश अकोलकर - ४०५ मते - प्रवीण पाटील - ३६८ मते - अभिमन्यू शितोळे - ३६० मते - अमित शानबाग - ३४८ मते - अजित जोशी - ३४० मते - सुधाकर काश्यप - ३२० मते
'मुंबई प्रेस क्लब' या संस्थेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अध्यक्षपदी विजय मिळवला आहे. केतकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ज्येष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी यांचा १२२ मतांनी पराभव केला. केतकर यांना ४४५ तर त्रिपाठी यांना ३२३ मतं मिळाली.
संस्थेच्या चेअरमनपदी राजेश मस्करेन्हास ४९० मते मिळवून विजयी झाले. त्यांनी विनोद जगदाळे (२८७ मते) यांचा पराभव केला. व्हाइस चेअरमन म्हणून क्रीडा पत्रकार अयाझ मेमन हे निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सय्यद वासीम हैदर यांना ३०५ मते मिळाली. सचिवपदी धर्मेंद्र जोरे यांनी ४७७ मते मिळवून प्रसाद काथे (२८८ मते) यांचा १८९ मतांनी पराभव केला. संयुक्त सचिवपदी रजनीश काकडे यांची निवड झाली. काकडे यांना ४६६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नंदकिशोर भारतीय यांच्या पारड्यात २९४ मते पडली. खजिनदारपदी ओम प्रकाश तिवारी विजयी झाले. त्यांना ४२९ तर प्रतिस्पर्धी उमेदवार वरुण सिंह यांना ३२१ मते मिळाली.
प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रेटिक अलायन्स (पीडीए) आणि युनायटेड अलायन्स फॉर इक्वॅलिटी (यूएइ) अशा दोन पॅनलमध्ये मुख्य लढत झाली. त्यात पीडीएने सर्व जागा जिंकत निर्भेळ यश मिळवले.
व्यवस्थापन समितीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे...
- संतोष आंधळे - ४८० मते - मृत्युंजय बोस - ४७० मते - लता मिश्रा - ४४१ मते - अशिष राजे - ४२१ मते - प्रकाश अकोलकर - ४०५ मते - प्रवीण पाटील - ३६८ मते - अभिमन्यू शितोळे - ३६० मते - अमित शानबाग - ३४८ मते - अजित जोशी - ३४० मते - सुधाकर काश्यप - ३२० मते