मुंबई: आईची हत्या करून तिचे तुकडे केल्याच्या आरोपाखाली अटकेत असणाऱ्या तरुणीनं पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे. आईची हत्या केली. पण तिच्या मृतदेहाचे तुकडे केले, असा जबाब आरोपी तरुणी रिंपल जैननं पोलिसांना दिला आहे. आईच्या मृत्यूसाठी मलाच जबाबदार धरण्यात येईल अशी भीती वाटत असल्यानं तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचं २५ वर्षांच्या रिंपलनं पोलिसांना सांगितलं.
रिंपलनं आई वीणाची हत्या केल्याचा आरोप आहे. मात्र तिनं आपण हत्या न केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. रिंपलच्या आईचं निधन तीन महिन्यांपूर्वी झालं. आईचा मृत्यू नैसर्गिक होता, असा तिचा दावा आहे. तीन महिन्यांत रिंपलनं आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र त्यात तिला अपयश आलं. शेजाऱ्यांना संशय आल्यास, नातेवाईक घरी आल्यास पकडले जाऊ अशी भीती रिंपलला वाटत होती.
लालबागमधील इब्राहिम कासीम चाळीत वीणा आणि रिंपल वास्तव्यास होत्या. या परिसर अतिशय गजबजलेला आहे. मायलेकी राहत असलेली चाळ मुख्य रस्त्याला लागून आहे. चाळीतले रहिवासी मध्यरात्री २ पर्यंत जागे असायचे. तर चाळीखाली असणारी दुकानं, हॉटेल्स, टपऱ्या पहाटे चार वाजताच सुरू व्हायच्या. त्यामुळे आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणं रिंपलला शक्य झालं नाही.
२७ डिसेंबरला वीणा पहिल्या मजल्यावरून खाली पडल्या. रिंपलनं आईची हत्या केल्याचा आरोप आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी रिंपलनं जवळच असलेल्या बाजारातून मार्बल कटर आणला. वीणा जैन कोणालाच दिसत नव्हत्या. शेजारी त्याबद्दल रिंपलकडे विचारणा करायच्या. त्यावर आई उपचारांसाठी कानपूरला गेल्याची बतावणी रिंपलनं केली.
रिंपलच्या घरातून येत असलेल्या दुर्गंधीमुळे संशय वाढत चालला होता. त्यामुळे रिंपलनं वेगळंच नाटक सुरू केलं. शेजाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून रिंपल घरासमोरच्या कॉमन पॅसेजमध्ये फिरायची. तिच्या कानाला फोन असायचा. आपण आईशी बोलत आहोत, असं ती दाखवत होती. दूर गेलेल्या आईसोबत आपण दररोज गप्पा मारतो, असं चित्र तिनं शेजाऱ्यांसाठी उभं केलं.
रिंपलनं आई वीणाची हत्या केल्याचा आरोप आहे. मात्र तिनं आपण हत्या न केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. रिंपलच्या आईचं निधन तीन महिन्यांपूर्वी झालं. आईचा मृत्यू नैसर्गिक होता, असा तिचा दावा आहे. तीन महिन्यांत रिंपलनं आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र त्यात तिला अपयश आलं. शेजाऱ्यांना संशय आल्यास, नातेवाईक घरी आल्यास पकडले जाऊ अशी भीती रिंपलला वाटत होती.
लालबागमधील इब्राहिम कासीम चाळीत वीणा आणि रिंपल वास्तव्यास होत्या. या परिसर अतिशय गजबजलेला आहे. मायलेकी राहत असलेली चाळ मुख्य रस्त्याला लागून आहे. चाळीतले रहिवासी मध्यरात्री २ पर्यंत जागे असायचे. तर चाळीखाली असणारी दुकानं, हॉटेल्स, टपऱ्या पहाटे चार वाजताच सुरू व्हायच्या. त्यामुळे आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणं रिंपलला शक्य झालं नाही.
२७ डिसेंबरला वीणा पहिल्या मजल्यावरून खाली पडल्या. रिंपलनं आईची हत्या केल्याचा आरोप आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी रिंपलनं जवळच असलेल्या बाजारातून मार्बल कटर आणला. वीणा जैन कोणालाच दिसत नव्हत्या. शेजारी त्याबद्दल रिंपलकडे विचारणा करायच्या. त्यावर आई उपचारांसाठी कानपूरला गेल्याची बतावणी रिंपलनं केली.
रिंपलच्या घरातून येत असलेल्या दुर्गंधीमुळे संशय वाढत चालला होता. त्यामुळे रिंपलनं वेगळंच नाटक सुरू केलं. शेजाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून रिंपल घरासमोरच्या कॉमन पॅसेजमध्ये फिरायची. तिच्या कानाला फोन असायचा. आपण आईशी बोलत आहोत, असं ती दाखवत होती. दूर गेलेल्या आईसोबत आपण दररोज गप्पा मारतो, असं चित्र तिनं शेजाऱ्यांसाठी उभं केलं.