अ‍ॅपशहर

Lata Mangeshkar: प्रत्येक श्वास जणू 'जय श्रीराम' म्हणतोय- लतादीदी

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचं औचित्य साधून गानकोकिळा लता मंगेशकर यांनी एक ट्वीट केलं आहे. कित्येक पिढ्यांचं स्वप्न साकार होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Aug 2020, 10:20 pm
मुंबई: अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन होत असताना देशभरात आनंद व उत्साहाचं वातावरण आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या निमित्तानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांनी एक सविस्तर ट्वीट करून आजच्या सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम लता मंगेशकर


वाचा: राम सगळ्यांचा असण्यातच 'राम' आहे; रोहित पवारांचं जबरदस्त ट्वीट

कित्येक राज्यकर्त्यांचे, कित्येक पिढ्यांचे आणि अखिल विश्वातील रामभक्तांचे स्वप्न आज साकार होत आहे. अनेक वर्षांच्या वनवासानंतर आज अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराची पुन्हा उभारणी होत आहे. कोनशिला बसवली जातेय. याचं सर्वाधिक श्रेय लालकृष्ण आडवाणी यांना जाते. रामजन्मभूमीच्या मुद्द्यावर रथयात्रा काढून आडवाणी यांनी संपूर्ण देशात जनजागृती केली होती. त्याबरोबर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनाही याचं श्रेय जातं,' असं लतादीदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

'करोनाच्या संकटामुळं आजही भलेही लाखो रामभक्त अयोध्येत जाऊ शकले नाहीत. पण प्रत्येकाचं मन आणि ध्यान आज फक्त श्रीरामाच्या चरणी असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा होतोय हे देखील आनंदाची गोष्ट आहे. माझं संपूर्ण कुटुंब आणि अवघं जगच आज आनंदलं आहे. प्रत्येक श्वास 'जय श्रीराम' म्हणतोय असं वाटतंय, अशी भावनाही लतादीदींनी व्यक्त केली आहे.

वाचा: राम मंदिराचं आज भूमिपूजन; शिवसेनेने व्यक्त केली 'ही' खंत!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज