सुरक्षेबाबत हॉटेल, रेस्तराँ आणि कारखान्यांमध्ये भेद नको
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
कमला मिल परिसरातील रेस्टोपबमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारखाने वा उद्योगांमधील सुरक्षाविषयक गुंतवणुकीच्या तुलनेत मनोरंजन क्षेत्रात येणारी हॉटेले, रेस्तराँ, पब यांच्या सुरक्षेवर अगदी नगण्य गुंतवणूक केली जात असल्याचे दिसते. कारखाने आणि हॉटेल, रेस्तराँ यांच्यामध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांच्या अंमलबजावणीबाबत एवढा भेद कसा केला जातो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कारखान्यांमध्ये जेवढ्या कठोरपणे अग्निसुरक्षेच्या यंत्रणेची तपासणी होते, तेवढ्याच कठोरपणे मनोरंजनाच्या ठिकाणीही होणे गरजेचे आहे, असा मुद्दा उद्योगपती अमेय जोगळेकर यांनी यासंदर्भात मांडला. एखाद्या प्रकल्पाच्या ठिकाणी किमान दहा टक्के रक्कम ही अग्निसुरक्षेवर गुंतवली जाते, मात्र मनोरंजनाच्या ठिकाणी ही गुंतवणूक फारच नगण्य असते. लाखो लोक या ठिकाणांना भेट देत असतात. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात गांभीर्य बाळगणे गरजेचे आहे, मी स्वत:ही अनेक पब, रेस्तराँ येथे जातो. त्यामुळे अग्निसुरक्षेच्या या तफावती जाणवतात,’ असे ते म्हणाले.
जागरुकता वाढतेय
हॉटेल, रेस्तराँ, पब, बार या ठिकाणी जाताना आतापर्यंत सुरक्षा हा मुद्दा लक्षात घेतला नव्हता, मात्र यापुढे ही काळजी नक्की घेतली जाईल, असे अनेक ग्राहकांनी सांगितले. हॉटेलमध्ये जाताना मित्रमैत्रिणींनी दिलेली माहिती, अॅपवरील रेटिंग याआधारे निर्णय घेतला जातो. मात्र यापुढे तरी अशा ठिकाणी गेल्यावर जिना कुठे आहे, अग्निशमन यंत्रणा आहे का, याची माहिती घेण्याचा निर्धार अनेक जण करताना दिसत आहेत.
जबाबदारी चालक, मालक, प्रशासनाचीच
अग्निसुरक्षेबाबतच्या नियमांच्या अमलबजावणीची जबाबदारी ही ग्राहकांची नाही, तर हॉटेल मालक-चालक, प्रशासनाचीच आहे, असे मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी स्पष्ट केले. अनेक हॉटेलांच्या कीचनमध्ये व्यावसायिक वापराचे सिलिंडर वापरले जातात, त्यावरही नियंत्रण नसते. अनेक गोष्टी अनधिकृत आहेत. यावर ग्राहकांनी लक्ष ठेवणे अपेक्षित नसल्याचे ते सांगतात. ज्याचे काम त्यानेच करणे अपेक्षित आहे. एखादी गोष्ट अधिकृत की अनधिकृत याचा शोध कसा घ्यायचा, अग्निसुरक्षेचे फलक नसल्याची तक्रार नेमकी कुठे करायची, ही तक्रार झाली तर त्यावर कारवाई होणार का, महापालिका अधिकारी, कर्मचारी त्यांची कामे नीट करतात का असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. सध्या बेकायदा बांधकामाविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व मुंबई स्वच्छ करून दाखवावी असे आवाहनही त्यांनी मुंबई ग्राहक पंचायतीच्या वतीने केले आहे. ही जबाबदारी ग्राहकांवर ढकलून यंत्रणा शांत बसू शकत नाही. संपूर्ण यंत्रणा सडलेली आहे, त्यामुळे ही मानसिकता बदलण्याची गरजही ते व्यक्त करतात.
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
कमला मिल परिसरातील रेस्टोपबमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारखाने वा उद्योगांमधील सुरक्षाविषयक गुंतवणुकीच्या तुलनेत मनोरंजन क्षेत्रात येणारी हॉटेले, रेस्तराँ, पब यांच्या सुरक्षेवर अगदी नगण्य गुंतवणूक केली जात असल्याचे दिसते. कारखाने आणि हॉटेल, रेस्तराँ यांच्यामध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांच्या अंमलबजावणीबाबत एवढा भेद कसा केला जातो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कारखान्यांमध्ये जेवढ्या कठोरपणे अग्निसुरक्षेच्या यंत्रणेची तपासणी होते, तेवढ्याच कठोरपणे मनोरंजनाच्या ठिकाणीही होणे गरजेचे आहे, असा मुद्दा उद्योगपती अमेय जोगळेकर यांनी यासंदर्भात मांडला. एखाद्या प्रकल्पाच्या ठिकाणी किमान दहा टक्के रक्कम ही अग्निसुरक्षेवर गुंतवली जाते, मात्र मनोरंजनाच्या ठिकाणी ही गुंतवणूक फारच नगण्य असते. लाखो लोक या ठिकाणांना भेट देत असतात. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात गांभीर्य बाळगणे गरजेचे आहे, मी स्वत:ही अनेक पब, रेस्तराँ येथे जातो. त्यामुळे अग्निसुरक्षेच्या या तफावती जाणवतात,’ असे ते म्हणाले.
जागरुकता वाढतेय
हॉटेल, रेस्तराँ, पब, बार या ठिकाणी जाताना आतापर्यंत सुरक्षा हा मुद्दा लक्षात घेतला नव्हता, मात्र यापुढे ही काळजी नक्की घेतली जाईल, असे अनेक ग्राहकांनी सांगितले. हॉटेलमध्ये जाताना मित्रमैत्रिणींनी दिलेली माहिती, अॅपवरील रेटिंग याआधारे निर्णय घेतला जातो. मात्र यापुढे तरी अशा ठिकाणी गेल्यावर जिना कुठे आहे, अग्निशमन यंत्रणा आहे का, याची माहिती घेण्याचा निर्धार अनेक जण करताना दिसत आहेत.
जबाबदारी चालक, मालक, प्रशासनाचीच
अग्निसुरक्षेबाबतच्या नियमांच्या अमलबजावणीची जबाबदारी ही ग्राहकांची नाही, तर हॉटेल मालक-चालक, प्रशासनाचीच आहे, असे मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी स्पष्ट केले. अनेक हॉटेलांच्या कीचनमध्ये व्यावसायिक वापराचे सिलिंडर वापरले जातात, त्यावरही नियंत्रण नसते. अनेक गोष्टी अनधिकृत आहेत. यावर ग्राहकांनी लक्ष ठेवणे अपेक्षित नसल्याचे ते सांगतात. ज्याचे काम त्यानेच करणे अपेक्षित आहे. एखादी गोष्ट अधिकृत की अनधिकृत याचा शोध कसा घ्यायचा, अग्निसुरक्षेचे फलक नसल्याची तक्रार नेमकी कुठे करायची, ही तक्रार झाली तर त्यावर कारवाई होणार का, महापालिका अधिकारी, कर्मचारी त्यांची कामे नीट करतात का असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. सध्या बेकायदा बांधकामाविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व मुंबई स्वच्छ करून दाखवावी असे आवाहनही त्यांनी मुंबई ग्राहक पंचायतीच्या वतीने केले आहे. ही जबाबदारी ग्राहकांवर ढकलून यंत्रणा शांत बसू शकत नाही. संपूर्ण यंत्रणा सडलेली आहे, त्यामुळे ही मानसिकता बदलण्याची गरजही ते व्यक्त करतात.