म. टा. प्रतिनिधी, मुंबई
'कृपया लक्ष द्या... प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर येणारी जलद लोकल अनिश्चित विलंबाने धावत आहे. प्रवाशांना होणाऱ्या असुविधेसाठी आम्ही दिलगीर आहोत...' मध्य रेल्वेवर सदासर्वकाळ होणाऱ्या या उद्घोषणेची मुंबईकर प्रवाशांना आता सवय झाली आहे. गेल्या काही दिवसांत विविध कारणांमुळे होणाऱ्या लोकल विलंबामुळे लाखो मुंबईकर हैराण झाले आहेत. टिटवाळा स्थानकात मंगला एक्स्प्रेसचे इंजिन बिघडल्याने शुक्रवारी देखील मध्य रेल्वेवरील जलद आणि धिम्या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. रोजच्या विलंबवारीमुळे त्रासलेला मुंबईकर सध्या एकच प्रश्न विचारतो, 'या मध्य रेल्वेचे करायचे काय?'
(वेळापत्रक बिघडलेलेच...११)