अ‍ॅपशहर

मुंबई: मध्ये रेल्वेची वाहतूक अजूनही धीम्या गतीने

मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेचे कल्याणहून मुबईकडे येणारी वाहतूक ४० मिनिटे उशिराने होत असून ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jun 2019, 1:15 pm
मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम local-train


मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर प्रभावित झालेली मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही धीम्या गतीने सुरू असून मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक सुमारे २५ मिनिटे उशिराने धावत आहे. सिग्नल बिघाडानंतर मध्य रेल्वेची कल्याणहून मुबईकडे येणारी वाहतूक ४० मिनिटे उशिराने होत होती. ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मात्र, अजूनही प्रवाशांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे.

डोंबिवलीहून आज सकाळी ८.४१ वाजताची सीएसएमटीच्या दिशेने सुटणारी लोकल ९.१० वाजता स्थानकात पोहोचली. तसंच डोंबिवलीला ८.४२ वाजता येणारी कल्याण लोकल अजूनही आलेली नसल्याचे प्रवासी सांगतात. मध्य रेल्वेवरील डाउन मार्गावरील लोकल वाहतूकही ३० ते ३५ मिनिटे उशिराने धावत असल्याचे वृत्त आहे.

तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत

या बरोबरच आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्यानंतर रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली. काल मान्सूनपूर्व पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. आजही रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना सलग दुसऱ्या दिवशी मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, हार्बर आणि पश्चिम मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज