अ‍ॅपशहर

लोकलने प्रवास करायचाय? मग ही बातमी काळजीपूर्वक वाचा!

Monthly Railway Pass: राज्य सरकारच्या निर्णयानुसार येत्या १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. अशा नागरिकांना मासिक पास देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे.

Authored byगणेश कदम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Aug 2021, 9:19 am
मुंबई: कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून लोकल ट्रेननं प्रवास करता येणार आहे. त्यासाठी नागरिकांची लसीकरण पडताळणी व विशेष मासिक पास देण्याची प्रक्रिया आज, ११ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मुंबई महापालिकेनं याबाबतचं सविस्तर माहिती पत्रक आज जारी केलं आहे. (Issuing of monthly railway pass valid from 15th Aug’21 begins from tomorrow)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Local Train Travelling
लोकल ट्रेन प्रवास


कुठे आणि कधी?

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ५३ रेल्वे स्थानकांवर हे पास मिळतील. मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावरील तिन्ही मार्गावरील स्थानकांचा यात समावेश आहे. या सर्व स्थानकांवर तिकीट खिडकीच्या शेजारी ३५८ मदत कक्ष असतील. सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत सलग ही प्रक्रिया सुरू राहील. आठवड्यातील सर्व दिवस ही प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहणार आहे. मुंबईसह आसपासच्या शहरांतील एकूण १०९ रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध असेल.

काय सोबत न्याल?

कोविड लसीचा दुसरा डोस घेऊन झाल्याचे प्रमाणपत्र (अर्थात, डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनंतर) व ओळखपत्र पुरावा नागरिकांनी सोबत आणणं आवश्यक आहे. यापैकी एकही पुरावा कमी असल्यास रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार नाही. नागरिकांनी घराजवळच्या रेल्वे स्थानकांवर पडताळणीसाठी जावे. मात्र, विनाकारण गर्दी करू नये, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. पडताळणीसाठी आणलेलं कोविड प्रमाणपत्र बनावट आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

अशी होईल पडताळणी?

मदत कक्षातील मुंबई महापालिकेचे कर्मचारी संबंधित नागरिकाच्या कोविड लसीकरण प्रमाणपत्राची वैधता कोविन अॅपवर तपासतील. तसंच, छायाचित्र ओळखपत्रही तपासतील. दोन्ही कागदपत्रे वैध आढळल्यास त्यावर शिक्का मारला जाईल. शिक्का मारलेले कोविड प्रमाणपत्र संबंधितांनी रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर सादर करावे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून मासिक पास देण्यात येईल. हा पास १५ ऑगस्टच्या आधी मिळणार असला तरी प्रवासासाठी तो १५ ऑगस्टपासूनच वैध असेल.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सध्याच्या पद्धतीनुसारच (कोविड लसीचे डोस घेतलेले असोत वा नसोत) प्रवासाची मुभा राहील, हेही स्पष्ट करण्यात आलं आहे.

आणखी वाचा:

प्रताप सरनाईक यांना त्रास देणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलं थेट आव्हान; म्हणाले...

डीजे लावून मध्यरात्री रस्त्यात नाचत होते, पोलीस येताच लाइट बंद केली आणि...

'या' बाबतीत महाराष्ट्र देशात नंबर वन ठरेल; मुख्यमंत्र्यांना विश्वास

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज