मुंबई: करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊन तसेच कठोर निर्बंध लादले असूनही रुग्णवाढ कमी झालेली नाही. त्यामुळेच करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. आपण हा निर्णय एकमताने घेतला पाहिजे. राज्यात लॉकडाऊन लावल्यास महिनाभरात परिस्थिती नियंत्रणात आणता येईल, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठकीत मांडले. त्यावर पूर्ण लॉकडाऊन केल्यास जनतेचा उद्रेक होऊ शकतो. तेव्हा जनभावनांचा विचार करूनच निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ( Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown ) वाचा: पुण्यातील करोनाची स्थिती गंभीर; लष्कराची मदत घेणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत राज्यातील करोनाची सध्याची स्थिती आणि आरोग्य व्यवस्था यावर प्रकाश टाकला. करोनाबाबत जे अंदाज आहेत ते पाहता १५ एप्रिल ते २१ एप्रिल यादरम्यान परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. सध्या जे नवे रुग्ण आढळत आहेत त्यात तरुणवर्गाचा सर्वाधिक समावेश आहे. करोनाचे रोजचे आकडे काळजी वाढवणारे आहेत. यंत्रणांवर ताण येत आहे. त्यातून यंत्रणांचा शक्तिपात होऊ नये यासाठी आपल्याला ठोस पावले टाकावी लागणार आहेत. काहीही करून करोनाची साखळी आपल्याला तोडावीच लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय दिसतो आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
वाचा: 'फडणवीस चालू देतील तोपर्यंतच ठाकरे सरकार चालेल'
करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आधी जिल्हा पातळीवर निर्बंध लावले गेले. नंतर राज्यभरात वीकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी कठोर निर्बंध लावण्यात आले. नव्याने गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या. मात्र स्थिती सुधारताना दिसत नाही. वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडा असे सांगूनही लोक कामासाठी घराबाहेर पडत आहेत. बाजारांतही गर्दी होत आहे. विवाह समारंभांमध्येही नियम पाळले जात नाहीत. त्यामुळेच आता आपल्याला कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. हा निर्णय एकमताने व्हावा अशी माझी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
वाचा: ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत
देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण लॉकडाऊन केल्यास जनतेच्या उद्रेकाची भीती व्यक्त केली. सरकारने कठोर निर्णय घ्यावा पण ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचा आधी विचार करावा. त्यांच्यासाठी आर्थिक पॅकेज द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. सरकारला आम्ही सहकार्य करू पण त्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्या आणि तुमच्या मंत्र्यांना समज द्या, असेही फडणवीस म्हणाले. मंत्री अशोक चव्हाण यांनी लॉकडाऊनबाबत मध्यम मार्ग काढण्याची सूचना केली. अचानकपणे लॉकडाऊन न लावता लोकांना दोन तीन दिवस आधी त्याबाबत कल्पना द्यावी, असेही ते म्हणाले.
वाचा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत राज्यातील करोनाची सध्याची स्थिती आणि आरोग्य व्यवस्था यावर प्रकाश टाकला. करोनाबाबत जे अंदाज आहेत ते पाहता १५ एप्रिल ते २१ एप्रिल यादरम्यान परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. सध्या जे नवे रुग्ण आढळत आहेत त्यात तरुणवर्गाचा सर्वाधिक समावेश आहे. करोनाचे रोजचे आकडे काळजी वाढवणारे आहेत. यंत्रणांवर ताण येत आहे. त्यातून यंत्रणांचा शक्तिपात होऊ नये यासाठी आपल्याला ठोस पावले टाकावी लागणार आहेत. काहीही करून करोनाची साखळी आपल्याला तोडावीच लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय दिसतो आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
वाचा: 'फडणवीस चालू देतील तोपर्यंतच ठाकरे सरकार चालेल'
करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आधी जिल्हा पातळीवर निर्बंध लावले गेले. नंतर राज्यभरात वीकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी कठोर निर्बंध लावण्यात आले. नव्याने गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या. मात्र स्थिती सुधारताना दिसत नाही. वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडा असे सांगूनही लोक कामासाठी घराबाहेर पडत आहेत. बाजारांतही गर्दी होत आहे. विवाह समारंभांमध्येही नियम पाळले जात नाहीत. त्यामुळेच आता आपल्याला कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. हा निर्णय एकमताने व्हावा अशी माझी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
वाचा: ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत
देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण लॉकडाऊन केल्यास जनतेच्या उद्रेकाची भीती व्यक्त केली. सरकारने कठोर निर्णय घ्यावा पण ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचा आधी विचार करावा. त्यांच्यासाठी आर्थिक पॅकेज द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. सरकारला आम्ही सहकार्य करू पण त्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्या आणि तुमच्या मंत्र्यांना समज द्या, असेही फडणवीस म्हणाले. मंत्री अशोक चव्हाण यांनी लॉकडाऊनबाबत मध्यम मार्ग काढण्याची सूचना केली. अचानकपणे लॉकडाऊन न लावता लोकांना दोन तीन दिवस आधी त्याबाबत कल्पना द्यावी, असेही ते म्हणाले.
वाचा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल