म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या असंतोषाचे जनक असणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या वाट्याला प्रजासत्ताक दिनी सरकारी स्तरावर मात्र उपेक्षाच आली आहे. टिळकांच्या समाधीस्थळी आजही सरकारी इतमामामध्ये ध्वजारोहण होत नाही. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे...’ या सिंहगर्जनेच्या शताब्दीनिमित्त नवी दिल्लीमध्ये टिळकांच्या कार्याचा वेध घेणारा चित्ररथ दिमाखात संचलन करणार आहे. मात्र गिरगाव चौपाटी येथील टिळकांच्या समाधीस्थळाकडे मात्र दुर्लक्षच होत आहे. राजघाटावर राष्ट्रपती आणि पंतप्रधान ज्याप्रमाणे मानवंदना देण्यासाठी जातात त्याचप्रमाणे टिळकांच्या समाधीस्थळी येऊन राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी मानवंदना द्यावी आणि मग सरकारी कार्यक्रमासाठी शिवाजी पार्क येथे जावे, अशी मागणी लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीतर्फे करण्यात आली आहे.
लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीतर्फे टिळकांच्या समाधीस्थळी पूर्वी ध्वजारोहणाची परवानगी नसल्याने गुपचूप ध्वजारोहण केले जात असे. गेल्या वर्षापासून मात्र या ठिकाणी ध्वजरोहणाची परवानगी मिळू लागली आहे. चौपाटीवर लोकमान्य टिळकांची समाधी आहे हे सरकारी दुर्लक्षामुळे लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. टिळकांचे कार्यही त्यामुळे दुर्लक्षित राहिले आहे. हे कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेत्यांनी या समाधीस्थळी येऊन ध्वजारोहण, पुष्पचक्र अर्पण करणे आवश्यक आहे अशी मागणी समिती संस्थापक अध्यक्ष प्रकाश सिलम यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याशिवाय त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही ध्वजारोहणासाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्याचबरोबर संजय निरूपम, सचिन अहिर, राज ठाकरे यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यानंतर लोकमान्य टिळकांचे समाधीस्थळ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तीन वर्षांनंतर येणाऱ्या टिळकांच्या १००व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने समाधीस्थळाजवळ चित्रशिल्प तयार व्हावे अशी समितीची इच्छा आहे. या चित्रशिल्पासाठी सुमारे ५०० ते ६०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासंदर्भात २०१५ मध्ये मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यांनी ‘लक्ष घालावे’ असा शेरा मारूनही कार्यवाही झालेली नाही.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या असंतोषाचे जनक असणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या वाट्याला प्रजासत्ताक दिनी सरकारी स्तरावर मात्र उपेक्षाच आली आहे. टिळकांच्या समाधीस्थळी आजही सरकारी इतमामामध्ये ध्वजारोहण होत नाही. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे...’ या सिंहगर्जनेच्या शताब्दीनिमित्त नवी दिल्लीमध्ये टिळकांच्या कार्याचा वेध घेणारा चित्ररथ दिमाखात संचलन करणार आहे. मात्र गिरगाव चौपाटी येथील टिळकांच्या समाधीस्थळाकडे मात्र दुर्लक्षच होत आहे. राजघाटावर राष्ट्रपती आणि पंतप्रधान ज्याप्रमाणे मानवंदना देण्यासाठी जातात त्याचप्रमाणे टिळकांच्या समाधीस्थळी येऊन राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी मानवंदना द्यावी आणि मग सरकारी कार्यक्रमासाठी शिवाजी पार्क येथे जावे, अशी मागणी लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीतर्फे करण्यात आली आहे.
लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीतर्फे टिळकांच्या समाधीस्थळी पूर्वी ध्वजारोहणाची परवानगी नसल्याने गुपचूप ध्वजारोहण केले जात असे. गेल्या वर्षापासून मात्र या ठिकाणी ध्वजरोहणाची परवानगी मिळू लागली आहे. चौपाटीवर लोकमान्य टिळकांची समाधी आहे हे सरकारी दुर्लक्षामुळे लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. टिळकांचे कार्यही त्यामुळे दुर्लक्षित राहिले आहे. हे कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेत्यांनी या समाधीस्थळी येऊन ध्वजारोहण, पुष्पचक्र अर्पण करणे आवश्यक आहे अशी मागणी समिती संस्थापक अध्यक्ष प्रकाश सिलम यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याशिवाय त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही ध्वजारोहणासाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्याचबरोबर संजय निरूपम, सचिन अहिर, राज ठाकरे यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यानंतर लोकमान्य टिळकांचे समाधीस्थळ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तीन वर्षांनंतर येणाऱ्या टिळकांच्या १००व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने समाधीस्थळाजवळ चित्रशिल्प तयार व्हावे अशी समितीची इच्छा आहे. या चित्रशिल्पासाठी सुमारे ५०० ते ६०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासंदर्भात २०१५ मध्ये मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यांनी ‘लक्ष घालावे’ असा शेरा मारूनही कार्यवाही झालेली नाही.