म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
शिवसेनेसोबत भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी युती केली असली तरी मराठी मतदारांची मते मोठ्या संख्येने मिळतील का, तर दुसरीकडे भाजपची व्होटबँक असलेली गुजराती-मारवाडी मते शिवसेनेच्या उमेदवारांना पडणार का, यावर युतीच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसोबत भाजपने युती केली. दोन्ही पक्षांचे नेते हेवेदावे विसरून एकत्र प्रचार करत आहेत. तसेच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढत आहेत. त्यात त्यांना यशही येत आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते प्रचारालाही लागले आहेत. मराठी, गुजराती आणि उत्तर भारतीय या मतांवरच या दोन्ही पक्षांची मदार आहे. त्यामुळे ही मते कशी पडतील, या विवंचनेत हे दोन्ही पक्ष आहेत.
उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गुजराती मतांचे प्राबल्य आहेत. परंतु या दोन्ही मतदारसंघात मराठी मते निर्णायक आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर गेले साडे वर्षे शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष सुरू होता. त्याचे पडसाद मुंबईत उमटले. उत्तर मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मराठी विभागात काम केले नाही, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे शेट्टी यांना मराठी विभागात किती कामे केली याची यादी प्रसिद्ध करावी लागली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात तर भाजपचे किरीट सोमय्या आणि शिवसैनिक यांच्यात गेले साडेचार वर्षे वैर आहे. सोमय्या यांची तिकीट कापले असले तरी मराठी मतदारांच्या मनात काय चालले आहे, याबाबत भाजपचे नेते गोंधळलेले आहेत. त्यात उत्तर आणि ईशान्य या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार हे मराठी आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात धाकधूक आहे.
दुसरीकडे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेच्या उमेदवारांना गुजराती आणि मारवाडी मते पडतील का, याची चिंता लागली आहे. भाजपचे कमळ या मतदारसंघात नसल्याने हे मतदार मतदानासाठी उतरतील का, असा प्रश्न आहे. याच बरोबर गेली काही वर्षे या भागातील सोसायट्यांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असा वाद सुरू असून हा प्रचाराचा मुद्दा करण्यात येत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये शिवसैनिकांना प्रचारासाठी प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे हे मतदार शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी उतरतील का, या बद्दल शिवसैनिकांना शंका आहे.
केवळ मराठी मतांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून येणार नाहीत आणि केवळ गुजराती मारवाडी मतांवर भाजपचे उमेदवार निवडून येणार नाहीत, हे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ओळखले असून त्यासाठी महायुतीने संयुक्त प्रचार मोहीम सुरू केली आहे.
शिवसेनेसोबत भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी युती केली असली तरी मराठी मतदारांची मते मोठ्या संख्येने मिळतील का, तर दुसरीकडे भाजपची व्होटबँक असलेली गुजराती-मारवाडी मते शिवसेनेच्या उमेदवारांना पडणार का, यावर युतीच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसोबत भाजपने युती केली. दोन्ही पक्षांचे नेते हेवेदावे विसरून एकत्र प्रचार करत आहेत. तसेच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढत आहेत. त्यात त्यांना यशही येत आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते प्रचारालाही लागले आहेत. मराठी, गुजराती आणि उत्तर भारतीय या मतांवरच या दोन्ही पक्षांची मदार आहे. त्यामुळे ही मते कशी पडतील, या विवंचनेत हे दोन्ही पक्ष आहेत.
उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गुजराती मतांचे प्राबल्य आहेत. परंतु या दोन्ही मतदारसंघात मराठी मते निर्णायक आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर गेले साडे वर्षे शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष सुरू होता. त्याचे पडसाद मुंबईत उमटले. उत्तर मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मराठी विभागात काम केले नाही, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे शेट्टी यांना मराठी विभागात किती कामे केली याची यादी प्रसिद्ध करावी लागली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात तर भाजपचे किरीट सोमय्या आणि शिवसैनिक यांच्यात गेले साडेचार वर्षे वैर आहे. सोमय्या यांची तिकीट कापले असले तरी मराठी मतदारांच्या मनात काय चालले आहे, याबाबत भाजपचे नेते गोंधळलेले आहेत. त्यात उत्तर आणि ईशान्य या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार हे मराठी आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात धाकधूक आहे.
दुसरीकडे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेच्या उमेदवारांना गुजराती आणि मारवाडी मते पडतील का, याची चिंता लागली आहे. भाजपचे कमळ या मतदारसंघात नसल्याने हे मतदार मतदानासाठी उतरतील का, असा प्रश्न आहे. याच बरोबर गेली काही वर्षे या भागातील सोसायट्यांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असा वाद सुरू असून हा प्रचाराचा मुद्दा करण्यात येत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये शिवसैनिकांना प्रचारासाठी प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे हे मतदार शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी उतरतील का, या बद्दल शिवसैनिकांना शंका आहे.
केवळ मराठी मतांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून येणार नाहीत आणि केवळ गुजराती मारवाडी मतांवर भाजपचे उमेदवार निवडून येणार नाहीत, हे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ओळखले असून त्यासाठी महायुतीने संयुक्त प्रचार मोहीम सुरू केली आहे.