मुंबईः सोशल मीडियाचा अतिरेक वाढत असतानाच हे माध्यम संवेदनशीलपणे हाताळले तर त्याचे चांगले परिणामही पाहायला मिळतात. त्याचाच प्रत्यय एका घटनेतून आला आहे. लोकल गोंधळात हरवलेल्या एका चिमुकलीला फेसबुक मेसेंजरमुळे तिचे आईवडील पुन्हा भेटले आहेत. महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना २ एप्रिल रोजी एक लहान मुलगी लोकलमध्ये चढली आणि तिचे कुटुंब मागे राहिले. आपली मुलगी दिसत नाही म्हटल्यावर पालकांनी नंतरची लोकल पकडून बोरीवलीच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र, ते मुलीला गाठू शकले नाहीच. दरम्यान, एक लहान मुलगी वाट चुकली आहे, हे प्रभादेवी स्थानकावर चढलेल्या परमिता गिरी यांच्या लक्षात आले आणि सोशल मीडियाचा उत्तम वापर करत परमिता यांनी या मुलीला तिच्या आईवडिलांपर्यंत पोहचवले. परमिता गिरी या मध्य रेल्वे विभागातील लेखापरीक्षा विभागात कार्यरत आहेत.
याबाबत बोलताना परमिता म्हणाल्या की, प्रभादेवीला मी बोरीवलीकडे जाणारी लोकल पकडली, तेव्हा एक मुलगी वाट चुकल्यासारखी दिसली. तिची चौकशी केली असता, ती फार काही बोलली नाही. त्यानंतर दादरला त्या मुलीला घेऊन मी उतरले. तिथे पोलिसांकडे गेलो. तेव्हा त्या मुलीने आपल्या वडिलांचे नाव सांगितले. लगेचच फेसबुकवर शोध घेतला असता, त्या मुलीने आपल्या वडिलांना ओळखले. त्या मुलीला वडिलांचा मोबाइल क्रमांकही माहीत नव्हता. त्यामुळे फेसबुक अकाउंटच्या आधारे मेसेंजर यावर त्या मुलीच्या वडिलांना मेसेज पाठवला. अन्य सोशल मीडियाचा वापर करून काही शोध लागतोय का, ते पाहिले. या मुलीला तिच्या घरी सोडायचेच, असा निश्चयच मी केला होता आणि प्रयत्न करून तो मी पूर्ण केला. दादर आणि बोरीवली येथील रेल्वे पोलिसांचे चांगले सहकार्य मिळाले, असे गिरी यांनी सांगितले. तर पालकांनी गिरी यांचे आभार मानले. मुंबईतील आजची परिस्थिती पाहता मूल चुकीच्या हातात तर पडणार नाही ना, याची फार काळजी आम्हाला वाटत होती. परंतु, गिरी यांच्यामुळे आम्हाला आमची मुलगी सुखरूप परत मिळाली, अशी प्रतिक्रिया मुलीच्या पालकांनी दिली.
याबाबत बोलताना परमिता म्हणाल्या की, प्रभादेवीला मी बोरीवलीकडे जाणारी लोकल पकडली, तेव्हा एक मुलगी वाट चुकल्यासारखी दिसली. तिची चौकशी केली असता, ती फार काही बोलली नाही. त्यानंतर दादरला त्या मुलीला घेऊन मी उतरले. तिथे पोलिसांकडे गेलो. तेव्हा त्या मुलीने आपल्या वडिलांचे नाव सांगितले. लगेचच फेसबुकवर शोध घेतला असता, त्या मुलीने आपल्या वडिलांना ओळखले. त्या मुलीला वडिलांचा मोबाइल क्रमांकही माहीत नव्हता. त्यामुळे फेसबुक अकाउंटच्या आधारे मेसेंजर यावर त्या मुलीच्या वडिलांना मेसेज पाठवला. अन्य सोशल मीडियाचा वापर करून काही शोध लागतोय का, ते पाहिले. या मुलीला तिच्या घरी सोडायचेच, असा निश्चयच मी केला होता आणि प्रयत्न करून तो मी पूर्ण केला. दादर आणि बोरीवली येथील रेल्वे पोलिसांचे चांगले सहकार्य मिळाले, असे गिरी यांनी सांगितले. तर पालकांनी गिरी यांचे आभार मानले. मुंबईतील आजची परिस्थिती पाहता मूल चुकीच्या हातात तर पडणार नाही ना, याची फार काळजी आम्हाला वाटत होती. परंतु, गिरी यांच्यामुळे आम्हाला आमची मुलगी सुखरूप परत मिळाली, अशी प्रतिक्रिया मुलीच्या पालकांनी दिली.