सततच्या पावसामुळे विमानतळाजवळील क्रांतीनगरात रात्री कंबरभर पाणी भरले. जवळून वाहणाऱ्या मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खोलगट भागात असलेले क्रांतीनगर पाण्याखाली गेले. याच वस्तीच्या मागच्या बाजूने असलेला नालाही विमानतळाकडून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे भरला व तेथील पाणी वस्तीत आले. त्यामुळे येथील १६००हून अधिक कुटुंबांना ऐन रात्री धावपळ करीत उंच भागावर असलेल्या बैल बाजारातील शाळेत आसरा घ्यावा लागला. या वस्तीत याआधीही पाणी भरले त्यावेळी नौदलाकडून बचावकार्य करण्यात आले.
क्रांतिनगरात कंबरभर पाणी
सततच्या पावसामुळे विमानतळाजवळील क्रांतीनगरात रात्री कंबरभर पाणी भरले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jul 2019, 4:00 am