मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
देशात वाढत चाललेल्या जातीय व धार्मिक हिंसाचाराच्या घटनांबद्दल सुप्रसिद्ध गीतकार व माजी खासदार जावेद अख्तर यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. 'आपण नेमकं कुठं चाललो आहोत हे एकदा शांतपणे बसून विचार करण्याची वेळ आली आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे संतप्त जमावानं शुक्रवारी एका पोलीस उपअधीक्षकाची दगडानं ठेचून हत्या केली होती. तसंच, हरयाणातील वल्लभगड येथील चार मुस्लिम तरुणांवर गुरुवारी रेल्वे गाडीत हल्ला झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला. हिंसाचाराच्या या वाढत्या प्रकारामुळं देशात अस्वस्थता आहे. जावेद अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून या अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली आहे. काश्मीर आणि हरयाणातील घटनांचा संदर्भ देऊन त्यांनी देशवासीयांना अंतर्मुख होण्याचं आवाहन केलं आहे. Lynching of an officer in Kashmir n four innocent Muslims in Haryana. Brothers n sisters We all need to think calmly where are we going. — Javed Akhtar (@Javedakhtarjadu) June 24, 2017
देशात वाढत चाललेल्या जातीय व धार्मिक हिंसाचाराच्या घटनांबद्दल सुप्रसिद्ध गीतकार व माजी खासदार जावेद अख्तर यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. 'आपण नेमकं कुठं चाललो आहोत हे एकदा शांतपणे बसून विचार करण्याची वेळ आली आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे संतप्त जमावानं शुक्रवारी एका पोलीस उपअधीक्षकाची दगडानं ठेचून हत्या केली होती. तसंच, हरयाणातील वल्लभगड येथील चार मुस्लिम तरुणांवर गुरुवारी रेल्वे गाडीत हल्ला झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला. हिंसाचाराच्या या वाढत्या प्रकारामुळं देशात अस्वस्थता आहे. जावेद अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून या अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली आहे. काश्मीर आणि हरयाणातील घटनांचा संदर्भ देऊन त्यांनी देशवासीयांना अंतर्मुख होण्याचं आवाहन केलं आहे. Lynching of an officer in Kashmir n four innocent Muslims in Haryana. Brothers n sisters We all need to think calmly where are we going. — Javed Akhtar (@Javedakhtarjadu) June 24, 2017