‘नमो युवा रोजगार केंद्रा’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांची घोषणा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेला माल थेट बाजारात विकता यावा, या उद्देशाने राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी सरकारने आठवडे बाजार सुरू केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड आणि ‘मी मुंबई अभियान-अभिमान’ यांच्या विद्यमाने ‘नमो युवा रोजगार केंद्रा’च्या शेतकरी फिरत्या बाजाराची सुरुवात येथे झाली. यावेळी महाराष्ट्र कृषी आणि फळ प्रकिया महामंडळाचे (मॅफ्को) पुनरुज्जीवन करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
युवा बेरोजगारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी फिरत्या बाजाराची योजना ‘मी मुंबई अभियान-अभिमान’चे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून राबविली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ‘मी मुंबई अभियान-अभिमान’ आणि मॅफ्को यांमध्ये सामंजस्य कराराचा मानसही व्यक्त केला. शेतकरी फिरत्या बाजाराच्या अॅपचेही अनावरण मुख्यमंत्र्यांनी केले. ‘मी मुंबई अभियान-अभिमान’चे अध्यक्ष प्रसाद लाड, श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडचे नरेंद्र पवार, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबईप्रमाणेच राज्यातील प्रत्येक शहरात ‘नमो युवा रोजगार केंद्र’ सुरू होणे गरजेचे आहे, या केंद्राच्या एका गाडीमुळे किमान चार जणांना रोजगार मिळेल. महाराष्ट्रात या केंद्राच्या ५०० नव्हे; तर पाच हजार गाड्या उभ्या राहिल्या पाहिजेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईत शेतकरी फिरत्या बाजाराच्या १०८ गाड्या लावण्यात येणार आहोत. १० गाड्या या ‘आईचा डबा’ उपक्रमासाठी वापरल्या जाणार आहेत. ‘आईचा डबा’च्या माध्यमातून मुंबईकरांना घरचे जेवण मिळणार आहे. या निमित्ताने महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मुंबईतील ५० महिला उद्योग गटांना याचा फायदा होणार आहे.
मॅफ्कोचा फायदा
भाजी व फळे यांची साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना जागा, पायाभूत सुविधा लागतात. बंद पडलेल्या मॅफ्कोमध्ये या सर्व पायाभूत सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहेत. मॅफ्को सुरू झाल्यास बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध होतील. त्याचा फायदा शेतकऱ्यांना व बेरोजगारांना होईल.
नमो युवा रोजगार केंद्र
शेतकऱ्यांना आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या गरिबांना ही योजना फायदेशीर आहे. यामध्ये विविध बचत गट स्वतः येऊन भाजी विकणार आहेत. यामुळे शेतकरी, बेरोजगार आणि महिला एकत्र येतील. तसेच शेतकऱ्यांना मुंबईत हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल.
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेला माल थेट बाजारात विकता यावा, या उद्देशाने राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी सरकारने आठवडे बाजार सुरू केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड आणि ‘मी मुंबई अभियान-अभिमान’ यांच्या विद्यमाने ‘नमो युवा रोजगार केंद्रा’च्या शेतकरी फिरत्या बाजाराची सुरुवात येथे झाली. यावेळी महाराष्ट्र कृषी आणि फळ प्रकिया महामंडळाचे (मॅफ्को) पुनरुज्जीवन करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
युवा बेरोजगारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी फिरत्या बाजाराची योजना ‘मी मुंबई अभियान-अभिमान’चे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून राबविली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ‘मी मुंबई अभियान-अभिमान’ आणि मॅफ्को यांमध्ये सामंजस्य कराराचा मानसही व्यक्त केला. शेतकरी फिरत्या बाजाराच्या अॅपचेही अनावरण मुख्यमंत्र्यांनी केले. ‘मी मुंबई अभियान-अभिमान’चे अध्यक्ष प्रसाद लाड, श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडचे नरेंद्र पवार, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबईप्रमाणेच राज्यातील प्रत्येक शहरात ‘नमो युवा रोजगार केंद्र’ सुरू होणे गरजेचे आहे, या केंद्राच्या एका गाडीमुळे किमान चार जणांना रोजगार मिळेल. महाराष्ट्रात या केंद्राच्या ५०० नव्हे; तर पाच हजार गाड्या उभ्या राहिल्या पाहिजेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईत शेतकरी फिरत्या बाजाराच्या १०८ गाड्या लावण्यात येणार आहोत. १० गाड्या या ‘आईचा डबा’ उपक्रमासाठी वापरल्या जाणार आहेत. ‘आईचा डबा’च्या माध्यमातून मुंबईकरांना घरचे जेवण मिळणार आहे. या निमित्ताने महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मुंबईतील ५० महिला उद्योग गटांना याचा फायदा होणार आहे.
मॅफ्कोचा फायदा
भाजी व फळे यांची साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना जागा, पायाभूत सुविधा लागतात. बंद पडलेल्या मॅफ्कोमध्ये या सर्व पायाभूत सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहेत. मॅफ्को सुरू झाल्यास बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध होतील. त्याचा फायदा शेतकऱ्यांना व बेरोजगारांना होईल.
नमो युवा रोजगार केंद्र
शेतकऱ्यांना आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या गरिबांना ही योजना फायदेशीर आहे. यामध्ये विविध बचत गट स्वतः येऊन भाजी विकणार आहेत. यामुळे शेतकरी, बेरोजगार आणि महिला एकत्र येतील. तसेच शेतकऱ्यांना मुंबईत हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल.