म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचे सूप गुरुवारी वाजल्यानंतर आगामी हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले. गेली तीन वर्षे नागपुरात अधिवेशन झालेले नाही. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असल्याचे सर्वांच्या नजरा या अधिवेशनाकडे लागून राहिल्या आहे. साधारण तीन आठवडे हे अधिवेशन चालेल असे सांगण्यात येत आहे. १९ डिसेंबरला अधिवेशन सुरु होईल.
आमदारांच्या वागणुकीसाठी नियमावली
मुंबईत पार पडलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान आमदारांच्या वर्तणुकीचा मुद्दा चांगलाच गाजला. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकादेखील केली. अखेर याची गंभीर दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतली असून आमदारांच्या वागणुकीसाठी नियमावली ठरविण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
या समितीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती निलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विधानसभेचे आणि विधान परिषदेतील अन्य काही आमदारांचा यात समावेश करण्यात आला आहे.
आमदारांच्या वागणुकीसाठी नियमावली
मुंबईत पार पडलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान आमदारांच्या वर्तणुकीचा मुद्दा चांगलाच गाजला. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकादेखील केली. अखेर याची गंभीर दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतली असून आमदारांच्या वागणुकीसाठी नियमावली ठरविण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
या समितीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती निलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विधानसभेचे आणि विधान परिषदेतील अन्य काही आमदारांचा यात समावेश करण्यात आला आहे.