अ‍ॅपशहर

दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी

राज्य सरकारने आज ऐतिहासिक निर्णय घेत ३४ हजार कोटींची शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील एकूण ८९ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. तर ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा सरकार पूर्णपणे कोरा करणार आहे.

Maharashtra Times 24 Jun 2017, 5:08 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra cabinet approves loan waiver for farmers upto rs 1 5 lakh
दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी


राज्य सरकारने आज ऐतिहासिक निर्णय घेत ३४ हजार कोटींची शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील एकूण ८९ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. तर ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा सरकार पूर्णपणे कोरा करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा हा निर्णय घेण्यात आला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाची घोषणा केली.

शेतकरी कर्जमाफीचे मुद्दे

- 'छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना' असे नाव या शेतकरी कर्जमाफीला देण्यात आले आहे

- ३० जून २०१६ पर्यंतच्या कर्जांची माफी होणार

- ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार

- पुनर्गठीत, थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा

- नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान, अनुदान थेट बँक खात्यात जमा करणार

- बँकांच्या माध्यमातून सरकार ३४ हजार कोटी रुपये उभारणार. हे पैसे बँकांना टप्प्या टप्प्याने राज्य सरकार परत करणार

- अतिशय कडक देखरेख ठेवून कर्जमाफीत घोटाळे होणारे नाही याची काळजी घेणार

- भाजपचे सर्व मंत्री आणि आमदार कर्जमाफीसाठी एक महिन्याचा पगार देणार

- आयकर भरणारे आणि व्यापारी आणि व्हॅटला पात्र असणाऱ्यांना कर्जमाफीतून वगळलं

- आजी-माजी मंत्री, क्लास वन अधिकारी कर्जमाफीला पात्र नाहीत

- ३४ हजार कोटींपेक्षा अधिक बोजा उचलण्याची राज्य सरकारची क्षमता नाहीः मुख्यमंत्री

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज