मुंबई: राज्यातील ठाकरे मंत्रिमंडळाच्या शपथविधी दरम्यान आज पुन्हा एकदा नाट्यमय घटना घडली. काँग्रेसचे आमदार के. सी. पाडवी यांनी शपथ घेताना स्वत:चं मनोगत व्यक्त केल्यानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी संतप्त झाले. त्यांनी पाडवी यांना पुन्हा मंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली.
मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी एक नमुना ठरलेला असतो. शपथ घेताना त्यातील मजकूर वाचणे अपेक्षित असते. मात्र, काँग्रेसचे अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार पाडवी यांनी शपथेच्या नमुन्याखेरीज स्वत:चं मनोगतही व्यक्त केलं. त्यामुळं राज्यपाल संतापले. त्यांनी पाडवी यांना समज दिली. 'आपल्याला दिलं गेलं आहे तेच वाचावं. अनावश्यक वाचू नये, असं राज्यपाल म्हणाले. 'माझ्यासमोर अनेक ज्येष्ठ नेते बसले आहेत. स्वत: शरद पवार आहेत. वाटल्यास त्यांना विचारा. त्यांना योग्य वाटत असेल तर माझी हरकत नाही,' असंही राज्यपाल म्हणाले. तसंच, पाडवी यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली. त्यानंतर पाडवी यांनी परंपरेनुसार शपथ घेतली. शपथपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर पाडवी यांनी राज्यपालांकडं दिलगीरीही व्यक्त केली.
महाविकास आघाडीच्या पहिल्या शपथविधीदरम्यानही याच मुद्द्यावरून वाद झाला होता. त्यावेळी शपथ घेताना उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आपापल्या पक्षप्रमुखांची व दैवतांची नावं घेतली होती. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी नाराजी दर्शवली होती. हा वाद विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातही गाजला होता. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी बेकायदेशीर असून तो पुन्हा घेण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षानं केली होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी त्या शपथविधीचे समर्थन केले होते. शपथेचा मसुदा आम्ही सलग वाचला होता. त्यामुळं कुठल्याही प्रथेचा भंग होत नसल्याचं सत्ताधारी पक्षानं स्पष्ट केलं होतं.
वाचा: आदिती तटकरे मंत्री, प्रणिती शिंदेंची संधी हुकली
वाचा: पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर 'ही' जबाबदारी?
मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी एक नमुना ठरलेला असतो. शपथ घेताना त्यातील मजकूर वाचणे अपेक्षित असते. मात्र, काँग्रेसचे अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार पाडवी यांनी शपथेच्या नमुन्याखेरीज स्वत:चं मनोगतही व्यक्त केलं. त्यामुळं राज्यपाल संतापले. त्यांनी पाडवी यांना समज दिली. 'आपल्याला दिलं गेलं आहे तेच वाचावं. अनावश्यक वाचू नये, असं राज्यपाल म्हणाले. 'माझ्यासमोर अनेक ज्येष्ठ नेते बसले आहेत. स्वत: शरद पवार आहेत. वाटल्यास त्यांना विचारा. त्यांना योग्य वाटत असेल तर माझी हरकत नाही,' असंही राज्यपाल म्हणाले. तसंच, पाडवी यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली. त्यानंतर पाडवी यांनी परंपरेनुसार शपथ घेतली. शपथपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर पाडवी यांनी राज्यपालांकडं दिलगीरीही व्यक्त केली.
महाविकास आघाडीच्या पहिल्या शपथविधीदरम्यानही याच मुद्द्यावरून वाद झाला होता. त्यावेळी शपथ घेताना उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आपापल्या पक्षप्रमुखांची व दैवतांची नावं घेतली होती. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी नाराजी दर्शवली होती. हा वाद विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातही गाजला होता. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी बेकायदेशीर असून तो पुन्हा घेण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षानं केली होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी त्या शपथविधीचे समर्थन केले होते. शपथेचा मसुदा आम्ही सलग वाचला होता. त्यामुळं कुठल्याही प्रथेचा भंग होत नसल्याचं सत्ताधारी पक्षानं स्पष्ट केलं होतं.
वाचा: आदिती तटकरे मंत्री, प्रणिती शिंदेंची संधी हुकली
वाचा: पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर 'ही' जबाबदारी?